दत्ता ठुबे/पारनेर प्रतिनिधी :- सेनापती बापट मल्टी स्टेट को-ऑप क्रेडीट सो.लि.पारनेर संचालित पारनेर तालुक्यातील शेतक-यांसाठी जैवीक, रासायनिक सर्व प्रकारची खते व सर्व बि-बियाणे खरेदीसाठी “सेनापती बापट कृषी संजिवनी अर्थसहाय्य कर्ज योजना” जय जवान जय किसान म्हणुन आपण शेतक-यांना गौरवितो पण आपण शेतक-यांच्या जीवनाच्या आडचणीचा कधी विचार करत नाही.आपल्या या मातृभुमीसाठी देशासाठी धान्य पिकवणारा सुजलाम सुफलाम धरती बनवणास हा शेतकरी स्वतःच्या पोटाचे खळगे भरण्यासाठी रात्रंदिवस शेतात राबतो . परंतु दोन वेळचे अन्न ही त्याच्या वाट्याला येत नाही, ऐशो आरामाचे जिवनही तो जगु शकत नाही.शेतकरी म्हणजे जो माणुस उन पाऊस, थंडी वाऱ्याची चिंता न करता आपल्या कष्टाने आपल्या शेतात पिके वाढवण्याची काम करतो आपल्या मेहनतीने तो शेतात विविध प्रकारचे धान्य,फळे, भाजीपाला पिकवतो आणि बाजारपेठात वाजवी भावात विकतो. शेतक-यांच्या कष्टाने पिकविलेल्या या खाद्य पदार्थ आणि भाजीपाला देशातील प्रत्येक व्यक्ती आपले अन्न म्हणुन वापरतो. पण आपल्याला जाणीव नसेल पण शेतक-यांचे जीवन अनेक समस्यांचे कष्टाने भरलेले आहे. विविध पिकांचे चांगले उत्पादन घेण्यासाठी शेतकरी आपल्या शेतात मेहनत घेतात. परंतु शेतक-यांकडे प्रतिक्षा क्षमतेचा अभाव असतो . कारण शेतक-याने एकदा पिक पेरल्यानंतर ते पिक यायला व त्याची विक्री होऊन त्याचे उत्पन्न हातात यायला काही काळ निघुन जातो.या काळात शेतक-यांच्या आर्थिक गरजा या निर्माण होणा-या असतात म्हणून त्याला कर्जाची आवश्यकता असते. शेती करण्यासाठी त्याला विविध प्रकारचा खर्च करावा लागतो,शेतीची जी विविध कामे आहेत, मजुरांची मजुरी देणे, शेतीसाठी अवजारे खरेदी करणे , शेतीची मशागत करणे,बि-बियाने, रासायनिक खते, किटकनाशके खरेदी करणे यासाठी शेतक-याला कर्जाची आवश्यकता असते.वेळेवर शेतक-याला पुरेसे कर्ज मिळत नाही. आणि त्यामुळे तो शेतामध्ये भांडवल टाकु शकत नाही. अाधुनिक पध्दतीने शेती करू शकत नाही. याचा परिणाम त्यांच्या उत्पादकतेवर होतो
शेतक-याला आर्थिक पाठबळ मिळविण्यासाठी त्याला वेळेवर कर्ज पुरवठा करण्यात आला तर ती वेळेवर शेतीमध्ये भांडवल गुंतवु शकेल,शेतीचा विकास करू शकेल ? त्यासाठी शेतक-यांना वेळेवर व पुरेसे कर्ज पुरविण्यासाठी पारनेर तालुक्यातील सर्वसामान्य गोरगरीब जनतेच्या शेतक-यांच्या , कष्टक-यांच्या मनगटाला बळकटी मिळावी म्हणून आम्ही शेतक-यांसाठी सेनापती बापट कृषी संजीवनी अर्थसहाय्य कर्ज योजना राबवत आहोत.जर शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळाला तर शेतकऱ्याच्या हातात उत्पन्न पुरेसे येईल त्यांचे दारिद्रय दूर होईल, त्यांच्या उत्पादनात स्वयत्तता निर्माण होईल आणि त्यामुळे शेतक-यांच्या मनात आत्महत्येचा विचार सुध्दा येणार नाही.या उदात्त हेतुने सेनापती बापट मल्टीस्टेट को ऑप क्रेडीट सो.लि. पारनेर या संस्थेने शेतक-यांसाठी बि-बियाणे व सर्व प्रकारची खते खरेदीसाठी या योजनेअंतर्गत रुपये ५०,०००/-( अक्षरी रुपये पन्नास हजार ) मात्र तातडीने अमुदत कर्ज योजना करण्यात आली असून त्याची त्वरीत अमंलबजावणी करण्यात येत आहे त्यासाठी सर्वाधिक शेतकरी बांधवांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेचे चेअरमन रामदास भोसले यांनी समस्त शेतकरी बांधवांना केले आहे.