नात्याला काळिमा फासणारी घटना! मुलाने जन्मदात्या बापाला पाठविले यमसदनी!
विलास तुपे
राजूर /प्रतिनिधी
आपळता जन्मदात्या बापाची निर्घृण पणे हत्या करत यमसदनी पाठविल्याची नात्याला काळिमा फासणारी घटना अकोले तालुक्यात घडली
आपल्या जन्मदात्याशी नेहमीच वाद घालणे, त्याला शिवीगाळ करणे, त्याला कुऱ्हाडीने मारणे अशाप्रकारचे हल्ले दृष्टप्रवृत्ती असलेला मुलगा काळू सतत करत असे. याबद्दल त्याने कारावासाची शिक्षाही भोगली . मात्र त्याने तो राग मनात धरला आणि जेल मधून सुटून बाहेर आल्यावर अखेर त्याने बापाचा काटा काढला आणि थेट यमसदनी पाठविले
याबाबत राजूर पोलिसांनी सांगितले की, वारूंघुशी येथील
बोरवाडी येथे रामदास लक्ष्मण घाणे (वय ६०) हे आपल्या तीन मुले व तीन मुलीसह राहतात त्यांना बाळू, काळू आणि राजू ही तीन मुले आहेत व तीन मुली आहेत. राजू बाहेर गावी राहतो तर बाळू पुणे जिल्ह्यात आपल्या पत्नीसह रोजगारासाठी जातो व महिना- दोन महिन्यांनी घरी येत असतो. काळू हा घरीच असतो. शनिवारी बकऱ्या विक्री वरून बाप लेकात भांडणे झाली. त्यातच काळूने आपल्या बापाचा खून केला. काळू घाणे याने (रामदास घाणे) बापाचा खून करून २५ किलोचे दोन दगड कंबरेला बांधून विहिरीत टाकून दिले व घरातील आई आणि बहिणीला ”तुम्ही कुणाला सांगाल तर तुमचाही काटा काढेल” असा सज्जड दम दिला. मात्र मंगळवारी त्याचा भाऊ बाळू घाणे घरी आला आणि त्याने आईला म्हतारा कुठे विचारले. असे विचारताच आई रडू लागली अन् त्याच वेळी काळू घरातून पळून गेला. ही घटना राजुला कळताच तोही पळत आला.
गुरुवारी सकाळी दोघा भावांनी विहिरीत असलेले आपल्या बापाचे प्रेत वर काढले. त्यावेळी स.पो. नि. नरेंद्र साबळे सहाय्यक नितीन खैरनार, हेड कॉन्स्टेबल डगळे, काळे उपस्थित होते. पंचनामा करून मृतदेह राजूर ग्रामीण रुग्णालयात आणून शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. राजूर पोलिसांनी खुनाचा भा. द. वि. ३०२ गुन्हा दाखल करून फरार झालेल्या आरोपीस पकडण्यासाठी पोलिसांना यश आले आहे
—– ——-/——–