इतर

रतनवाडीत रौप्य महोत्सवी राज्यस्तरीय गिर्यारोहण शिबिर संपन्न


अकोले प्रतिनिधी

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, विद्यार्थी विकास मंडळ आणि डाॕ.डी.वाय.पाटील युनिटेक सोसायटीचे, डाॕ.डी.वाय पाटील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय,आकुर्डी यांच्या संयुक्त विद्यमाने मौजे रतनवाडी,कळसूबाई-हरिश्चंद्रगड-अभयारण्य येथे राज्यस्तरीय आदिवासी सांस्कृतिक आदान प्रदान – गिर्यारोहण शिबिर पार पडले. या शिबिराचे आयोजन संस्थेचे अध्यक्ष मा. डॉ. पी. डी. पाटील सर, उपाध्यक्ष मा. डाॕ. भाग्यश्रीताई पाटील, सचिव मा. डॉ. सोमनाथदादा पाटील, विश्वस्त डाॕ. स्मिता जाधव मॕडम, खजिनदार डाॕ. यशराज पाटील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, विद्यार्थी विकास मंडळ संचालक डाॕ. संतोष परचुरे आणि प्राचार्य डाॕ. मोहन वामन यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, विद्यार्थी विकास मंडळ व प्राचार्य डाॕ. मोहन वामन हे 1997 पासून कळसूबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्यातील रतनवाडी येथे राज्यस्तरीय गिर्यारोहण शिबिर घेत आहेत. या शिबिराचे हे रौम्य महोत्सवी वर्ष होते. 17 मार्च ते 20 मार्च दरम्यान झालेल्या या शिबिरात राज्यभरातून 297 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवीला. सर्व विद्यार्थ्यांना रॕंपलिंगचे प्रशिक्षण, रतनगडचे ट्रेकींग करण्यात आले. शिबिरार्थींसाठी त्या भागातील आदिवासींच्या सण- उत्सवाचे गाणी, जोहार याची माहिती देणारे कार्यक्रम तसेच व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांना परदेशी तणांची होळी या विषयावर श्री. सचिन पुणेकर, सह्याद्रीतील भौगोलिक विविधता या विषयावर प्रा. डाॕ. रविंद्र जायभाये, जैव-विविधता या विषयावर प्रा.महेंद्र ख्याडे, औषधी वनस्पती या विषयावर प्रा. सुभाष वरपे, देवराई बद्दल प्रा. संदीप देशमुख यांनी मार्गदर्शन केले. कवी तुकाराम धांडे यांचा जोहार आणि कवितांचा कार्यक्रम झाला.
शिबिराच्या समारोपप्रसंगी प्रमुख पाहुणे जेष्ठ साहित्यिक प्रा. रंगनाथ पठारे, वन्यजीव विभाग नाशिकचे सहायक वनसंरक्षक श्री. गणेश रणदिवे, बी.एस. टी महाविद्यालय संगमनेरचे प्राचार्य डाॕ. डी. डी. पाटील, प्रा. डाॕ. बाळासाहेब वाघ, रतवाडीचे माजी सरपंच श्री. पांढरे पाटील हे होते. रतनवाडी गेली २५ वर्ष ज्यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यस्तरीय गिर्यारोहण शिबिर होत आहे त्या प्राचार्य डाॕ. मोहन वामन सरांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पुणेरी पगडी, सन्मानचिन्ह आणि मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. तसेच शिबिरासाठी आतापर्यंत सहकार्य करणाऱ्या रतनवाडीतील ग्रामस्थ, विविध महाविद्यालयाचे प्राचार्य आणि प्राध्यापक, वन अधिकारी, पत्रकार सर्वांचाच सन्मान करण्यात आला. याप्रसंगी प्राचार्य डाॕ. मोहन वामन यांनी पंचवीस वर्ष शिबिर घेत असताना आलेल्या अडी-अडचणीवर मात करून केलेल्या यशस्वी वाटचालीचा आढावा घेतला. श्री. रणदिवे यांनी या शिबिरातून विद्यार्थ्यांवर निसर्ग संवर्धनाचे संस्कार होतात ही बाब कौतूकास्पद आहे असे मत व्यक्त केले. प्राचार्य डी.डी. पाटील यांनी अशी शिबिरे होणे विद्यार्थी हिताचे आहेत असे मत मांडले. जेष्ठ साहित्यिक प्रा. रंगनाथ पठारे यांनी आपल्या मार्गदर्शनात प्राचार्य डाॕ. वामन सरांचे कौतुक करतानाच माणूस होण्यासाठी औपचारिक शिक्षणा व्यतिरिक्त महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना निसर्ग, गडकिल्ले संवर्धनाची व सामाजिक बांधिलकीच्या जाणीवेचे शिक्षण देणारे हे शिबिर खूप महत्वाचे आहे असे मत व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी भंडारा आर. एफ. ओ श्री. अमोल आडे, राजूर आर.एफ.ओ. श्री. डी. डी. पडवळे, रतनवाडी वनपाल सचिन धिंडळे, वनरक्षक एम. ए. सरोदे तसेच बी. एस. टी महाविद्यालय संगमनेरचे प्राध्यापक आणि प्रशासकीय कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. भागवत देशमुख तर आभार खलिद शेख यांनी मानले.
या शिबिराच्या नियोजनात विद्यार्थी विकास अधिकारी डाॕ. मुकेश तिवारी, प्रा. गणेश फुंदे, प्रा. खलिद शेख, डाॕ. मिनल भोसले, प्रा. भागवत देशमुख, प्रा. राधाकृष्ण ठाणगे, प्रा. भागवत ढेसले, प्रा. चेतन सरवदे, प्रा. करिश्मा सय्यद, डाॕ. विशाल गायकवाड, प्रा. मयुर मुरकुटे प्रा. सतिश ठाकर, प्रा.बबलू नवले, प्रा. रोहित वरवडकर,प्रा. स्वप्नाली बिरनाळे, प्रा. यशदा शिंदे, प्रा.मैथिली मुळे, प्रा.जितेंद्र कांबळे यांनी सहभाग घेतला.
या शिबिरासाठी रतवाडी ग्रामस्थ तसेच सरपंच संपत झडे, श्री. नाथा झडे व दशरथ झडे यांचे सहकार्य लाभले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button