इतरमहाराष्ट्र

हरिश्चंद्रगडावर जाण्यासाठी पक्का रस्ता करा -भाऊसाहेब देशमुख

अकोले प्रतिनिधी
हरिश्चंद्रगडावर जाण्यासाठी पक्का रस्ता करावा अशी मागणी कोतुळ येथील सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब भगवंता देशमुख यांनी केली आहे

मुळा नदीचे उगमस्थान असणारे हरिश्चंद्र गड हे प्राचीन आणि महाराष्ट्रातील एक प्रमुख पर्यटन स्थळ आहे या पर्यटन स्थळाला ऐतिहासिक वारसा आहे यामुळे राज्यभरातून अनेक पर्यटक या ठिकाणी हरिश्चंद्रगडावर भेट देतात येथील निसर्ग सौंदर्य याला पर्यटक भारावून जातो मात्र रस्त्या अभावी अनेक पर्यटकांना हरिश्चंद्रगडावर भटकंती करण्यासाठी अडचण निर्माण होते रस्ता व लाईट यासारख्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्यास गडावर पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढेल असा विश्वास श्री देशमुख यांनी व्यक्त केला आहे

राजा हरीचंद्राचा वारसा जपणारे आमदार डॉ. किरण लहामटे यांनी यात लक्ष घालून वनविभाग व पर्यटन विभागाच्या माध्यमातून गडावर जाण्यासाठी पक्का रस्ता करावा त्यामुळे अकोले तालुक्यातील हे एक पर्यटन स्थळ विकसित होईल व पर्यटकांची गर्दी वाढेल गडावर जाण्यास दोन मार्ग आहे परंतु ते दोन्ही मार्ग खडतर आहे या पैकी एका मार्गाचा रस्त्याचे मजबुतीकरण झाल्यास हरिश्चंद्रगड पर्यटकांनी गजबजून जाईल स्थानिक आदिवासी लोकांना देखील या परिसरात रोजगार उपलब्ध होईल यामुळे गडावर जाण्यासाठी रस्ता आणि ठिकाणी सौर ऊर्जेची सुविधा निर्माण करावी अशी मागणी पर्यटक करतात या मागणीचा विचार करुन आमदार डॉ किरण लहां मटे यांनी विचार करावा असे श्री भाऊसाहेब देशमुख यांनी म्हटले आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button