पिंपळगाव खांड धरण स्थळावर धरणे आंदोलन !

पिंपळगाव खांड धरणातून पाणी जाऊ देणार नाही-
सीताराम पाटील गायकर
कोतुळ प्रतिनिधी
पिंपळगाव खांड जलाशयातून पाणीयोजना जाऊ देणार नाही असा इशारा ज्येष्ठ नेते अगस्ती कारखान्याचे व्हाईस चेअरमन सिताराम पाटील गायकर यांनी दिला आहे
संगमनेर तालुक्यातील पठार भागातील अकरा गावांसाठी जलजीवन मिशन अंतर्गत 65 कोटीची पाणी योजना मंजूर झाली असून या योजने साठी पिंपळगाव खांड जलाशयातून पाणी देण्याचे प्रस्तावित केले आहे या योजनेची निविदा प्रसिद्ध केली असून योजनेची कार्यवाही सुरू झाली आहे या पार्श्वभूमीवर मुळा परिसरातील पिंपळगाव खांड धरण लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या पाणी बचाव कृती समितीने रविवार (दि 12) रोजी पिंपळगाव खांड जलाशयावर धरणे आंदोलन करण्यात आले
जिल्हा बँकेचे माजी चेअरमन व विद्यमान संचालक सिताराम पाटील गायकर यांच्या नेतृत्वाखाली हे धरणे आंदोलन सकाळी करण्यात आले
या आंदोलनात कोतुळ परिसरातील बोरी, कोतुळ ,वाघापूर पांगरी ,पिंपळगाव खांड, लिंगदेव, चास ,पिंपळदरी, परिसरातील, शेतकरी सहभागी झाले,
यावेळी बोलताना सिताराम पाटील गायकर यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितले की कोणत्याही परिस्थितीत धरणातून थेट पाणी दिले जाणार नाही पठार भागासाठी पिण्याचे पाणी दिले पाहिजे या भूमिकेसोबत आम्ही आहोत परंतु त्यासाठी पिंपळगाव खांड धरणाचे खालील बाजूस मुळा नदीत खालच्या बाजूला स्वतंत्र साठा बंधारा बांधून अगोदर पाणी साठा निर्माण करावा व त्यातून या पाणी योजनेला पाणीपुरवठा करावा याबाबत आमची काही हरकत नाही परंतु पिंपळगाव जलाशयातून पाण्याचा फुटबॉल टाकू दिला जाणार नाही असा इशारा त्यांनी दिला
उपमुख्यमंत्री अजित दादांच्या प्रयत्नातून पिंपळगाव खांड हे 600 दशलक्ष घनफूट क्षमतेचे धरण बांधले गेले यातून परिसरातील गावांच्या शेतीचा पाणी प्रश्न सुटला आहे परंतु या धरणातून पाणीयोजना झाल्यास धरणाला आरक्षण लागल्यास परिसरातील शेतकरी कर्जबाजारी होऊन उध्वस्त होईल सहाशे क्षमतेचा साठा हा तितकासा पुरेसा नाही आजही शेतकऱ्यांना एप्रिल-मे मध्ये पाण्याचा तुटवडा भासतो त्यातच पाणी योजना झाल्यास हा साठा अपुरा पडेल म्हणून या धरणातून संगमनेर तालुक्यातील पठारावरील अकरा गावांसाठी थेट पाईप ने पाणीपुरवठा करू देणार नाही नाशिक येथे वरिष्ठ अभियंत्यांची याबाबत चर्चा झाली आहे त्यानंतर तू खरच अजित दादा व जलसंपदामंत्री जयंत पाटील यांची भेट घेणार असल्याचे श्री गायकर यांनी यावेळी बोलताना दिला
पिंपळगाव खांड धरणाच्या खालील बाजूस मुळा नदीवर काही साइट्स आहे याठिकाणी नवीन साठा बंधारा तयार करून त्यातून या योजनेला पाणीपुरवठा करा करावा मात्र पिंपळगाव खांड च्या धरणात फुटबॉल टाकू दिला जाणार नाही असे त्यांनी ठणकावून सांगितले
यावेळी वाघापूर चे भाऊसाहेब पराते, भाऊसाहेब रक्टे,लिंगदेव चे प्रभाकर फापाळे, भाऊसाहेब हाडवळे, सहदेव चौधरी ,आत्माराम शेटे शिवाजी वाल्हेकर भानुदास डोंगरे ,शरद चौधरी ,प्रमोद मंडलिक, अशोकराव देशमुख ,मच्छिंद्र धुमाळ महेश नवले ,विजय शेटे,सुरेश देशमुख,आदी श सह परिसरातील शेतकरी उपस्थित होते

पठार भागातील 11 गावांची पाणीपुरवठा योजना मंजूर झालेली आहे यावरून गेली दोन महिने पासून पिंपळगाव खांड धरण परिसरात संघर्ष सुरू आहे पठारावरील पाणी योजने साठी या धरणातून ही पाईपलाईन जाऊ नये अशी संघर्ष समितीची भूमिका आहे