समाजाभिमुख नेता… काटे नसलेला गुलाब…!

सुशीलकुमार शिंदे सहस्रचंद्र दर्शन सोहळ्याच्या ८१ वर्षात ४ सप्टेंबर रोजी पाऊल ठेवित आहेत
. महाराष्ट्राच्या राजकारणात ज्या नेत्याला अगदी चपखल शोभून दिसेल असे त्यांचे वर्णन म्हणजे…. ‘काटे नसलेला गुलाब….’ या एका ओळीत त्यांचे सगळे व्यक्त्ाीमत्त्व नेमके व्यक्त होते. महाराष्ट्राच्या राजकाणातील सदा प्रसन्न, हसतमुख… निवडणुकीत विजयी झाल्याने हुरळून न जाणारे आणि पराभूत झाल्याने चेहऱ्यावरील हास्य गायब न झालेले, असे जे थोडे नेते आहेत… त्यातले दोन चेहरे समोर येतात… एक राजारामबापू पाटील आणि दुसरे म्हणजे सुशीलकुमार शिंदे…
मला तर नेहमी असे वाटते की, जग िनर्माण होवून लाखो वर्षे झाली…. कोणीही मोजली नाहीत. मोजताही येणार नाहीत… पण रोजची सकाळ जशी प्रसन्न वाटते असा गेल्या ५० वर्षातील राजकारणातील सदा प्रसन्न व्यक्तीमत्त्वाचा चेहरा म्हणून सुशीलकुमार यांचेच नाव समोर येते.
महाराष्ट्राच्या राजकारणात आवश्यक असलेली ‘जात’ जवळ नसताना, प्रवाहाच्या विरुद्ध पोहून आपले आयुष्य त्यांनी ज्या पद्धतीने घडवले, हे सोपे काम नाही. आयुष्याच्या सुरुवातीला अनेक नेत्यांना संघर्ष करावा लागतो. घरी राजकारणाचा काही वारसा नसताना, दोन वेळेच्या जेवणाचीही भ्रांत असताना, सोलापूरच्या ढोर गल्लीतला एक छोटा मुलगा दिल्लीपर्यंत देशाच्ो गृहमंत्रीपद, संसदेचे नेते पद भूषवितो… मला असे वाटते की, महाराष्ट्राला भूषण वाटावे, असे हे कतृत्त्व आहे. आणि या सर्वकाळात सुशीलकुमार शिंदे जमिनीवर राहिले. काळावर पाऊले उमटवून आपला ठसा त्यांनी निर्माण करून ठेवला आहे. ९ नोव्हेंबर १९७४ ते आजच्या तारखेपर्यंत हा त्यांचा प्रवास राजकारणातील आणि जवळपास ५२ वर्षांचा… त्याच्या आगोदरचा प्रवास म्हणजे, जीवनाची सुरुवात एका कोर्टातील बेलीफ, नंतर जिद्दीने वकील, नंतर पोलीस खात्यात प्रवेश. तिथे एका पोलीस ठाण्याचे प्रमुख आणि अचानक एक दिवस म्हणजे १९७४ साली शरद पवार साहेबांकडून काँग्रेसमध्ये येण्याचे आमंत्रण…. विधानसभेचे ितकीट देण्याचे आश्वासन…. त्याकरिता नोकरी सोडणे…. ितकीट िमळाले नाही म्हणून नोकरी गेली आिण आमदारपदही गेले… पण त्यांच्या चेहऱ्यावर फरक पडला नाही. परिस्थितीचा सामना करत असताना त्यांच्या नशिबाने पुढच्याच वर्षी पोटनिवडणूक झाली आणि करमाळा मतदार संघातून ते आमदार झाले.
त्यांच्या पोटनिवडणुकीच्या प्रचाराला त्यावेळचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वसंतराव नाईक जातात… ते भाषणात सांगतात की, ‘पोट निवडणूक प्रचाराला मुख्यमंत्री कधी येत नाहीत…. पण, या माणसाला निवडून द्या…. पुढचे माझ्यावर सोडा…’आणि निवडणुकीतील यशानंतर ९ नोव्हेंबर १९७४ ला राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली त्या दिवसापासून या नेत्याने मागे वळून पाहिले नाही. राज्यमंत्री, मग कॅबिनेट मंत्री, ९ वर्षे अर्थमंत्री, नगरविकास मंत्री, १८ जानेवारी २००३ ते २ नोव्हेंबर २००४ राज्याचे मुख्यमंत्री…. २००४ ते २००६ आंध्रप्रदेशचे राज्यपाल… २९ जानेवारी २००६ ला केंद्र सरकारमध्ये ऊर्जा मंत्री, २०१२ ला देशाचे गृहमंत्री… संसदेचे नेते… असा एक फार मोठा राजकीय काळ सुशीलकुमार शिंदे यांनी अनुवभवला. पण, लोकांपासून ते कधीही दूर झाले नाहीत. काँग्रेस पक्षात आल्यादिवसापासून आजतागायत ते काँग्रेसचेच आहेत. शरद पवार यांनी त्यांना राजकारणात आणले. शरद पवारसाहेबांनी वेगळा पक्ष उभा केला तेव्हा शिंदेसाहेब त्यांच्यासोबत गेले नाहीत. ते काँग्रेस सोबतच राहिले. पण, यशवंतरावांचा आणि शरद पवारांचा विचार याची साथही त्यांनी कधीही सोडली नाही. अत्यंत संयमित, सर्व राजकीय पक्षांत भरभरून मित्र आणि देशाच्या राजकारणातील आपल्या कतृत्त्वाने स्वत:ची जागा निर्माण करण्याचे कौशल्य त्यांनी सिद्ध केले आहे.
सोलापूरातून सर्वसाधारण जागेवर लोकसभेत निवडून आलेल्या सुशीलकुमारांना युनाेमध्ये पाठवायच्या शिष्टमंडळाचे अध्यक्ष, त्यावेळी पंतप्रधान असलेल्या वाजपेयींनीच केले. गुजरात भूकंपाच्या वेळी वाजपेयी साहेबांनीच शरद पवार साहेबांना आपत्ती व्यवस्थापनाचे अध्यक्ष करून भूज येथे झालेल्या भूकंपाच्यावेळी तेथे पाठवले. त्यावेळच्या सत्ताधारी नेत्यांची विरोधकांशी वागण्याची आणि नातं राखण्याची ही सुसंस्कृत पद्धत होती. अलिकडे हे सगळे पहायला मिळणे शक्य नाही. ‘विरोधक म्हणजे शत्रू’. असा आताचा काळ.
महाराष्ट्रात यशवंतराव असोत…. शरद पवार असोत… किंवा सुशीलकुमार असोत… विरोधकांना त्यांनी कधीही शत्रू मानले नाही….
सुशीलकुमारांच्या राजकारणाचीसुद्धा एक फार मोठी गंमतच आहे… आणि अशा राजकीय घटना त्यांनी कधीच मनाला लावून घेतल्या नाहीत. जेव्हा सोलापूरचा लोकसभा मतदारसंघ राखीव नव्हता… तेव्हा सोलापूरच्या मतदारांनी तीन वेळा सुशीलकुमारांना लोकसभेत मोठ्या मताधिक्याने पाठवले. आणि हा मतदारसंघ ‘राखीव’ झाला तेव्हा ते पराभूत झाले. आपला पराभव त्यांनी खेळाडूपणे स्वीकारला आणि पचवलाही…. पण सोलापूर लोकसभा मतदारसंघाचा आज कसा विचका आणि पचका झाला आहे, हे अाता सोलापूरकर अनुभवित आहेत.
दोन संदर्भ मुद्दाम सांगतो…. इतिहास असे सांगतो की, या देशात ज्याला ‘राज्यपाल’ म्हणून केंद्रीय गृहखात्याने राष्ट्रपतींमार्फत नियुक्त केले, त्या सर्वांची राज्यपालपदाची मुदत संपल्यावर राजकारणातूनच निवृत्त व्हावे लागले. सुशीलकुमार हे असे सन्माननीय अपवाद अाहेत की, आंध्रप्रदेशच्या राज्यपाल पदाची मुदत संपताच देशाच्या केंद्रीय नेत्यांनी त्यांच्यावर केंद्रीय ऊर्जा मंत्रीपदाची जबाबदारी सलग साडेसहा वर्ष सोपवली. सलग साडेसहा वर्षे हे खाते सांभाळलेले सुशीलकुमार एकमेव आहेत. आणि या काळात देशाच्या इंटरस्टेट ग्रिडींगची व्यवस्था त्यांच्याकाळात निर्माण झाली. दोन लक्ष पेक्षा अधिक औष्णिक ऊर्जा प्रकल्पांची िनर्मिती त्यांच्याच काळात झाली. हे इंटरस्टेट ग्रिडींग म्हणजे महाराष्ट्रातील वीज पुरवठ्यात अचानक काही बिघाड झाला तर मध्यप्रदेशकडून महाराष्ट्राला वीज मिळू शकते. हे इंटरस्टेट ग्रिडींग सुशीलकुमार यांच्या काळात झाले. संसदेचा नेते असलेला सुशीलकुमार हे एकमेव मराठी नेते आहेत. मनमोहन सिंग लोकसभेचे सभासद नसल्याने ही जबाबदारी सुशीलकुमार यांच्यावर आली.
या नेत्याने केवळ एका जिल्ह्यासाठी म्हणजे सोलापूर जिल्ह्याकरिता अख्खं विद्यापीठ मंजूर करून आणले.
गृहमंत्री असताना एक संपूर्ण दिवस आणि पूर्ण रात्र ते कुठे आहेत याचा पत्ता नव्हता…. त्यांच्या घरून सौ. उज्ज्वलावहिनी सतत संपर्क करत होत्या…. पण, ते कुठे आहेत, पत्ता लागत नव्हता…. दुपारी घरी जेवायला आले नाहीत…. रात्री जेवायला आले नाहीत… नेमके कुठे आहेत, मािहती नाही…. गृहमंत्रालयात नाहीत…. मोबाईल स्वीच अॅाफ त्यांचा आणि सगळ्या स्टाफचाही. पहाटे पाच वाजता सुशीलकुमारजी घरी आले…. ‘खूप भूक लागलीय’ म्हणाले…. सौ. उज्ज्वलावहिनी म्हणाल्या, ‘होतात कुठे?’ हे महाराज म्हणाले, ‘पहिले जेवायला वाढ….’ जेवले आणि लगेच झोपी गेले… सकाळी सात वाजता त्यांच्या कन्येचा मुंबईहून आईला फोन गेला…. ती फोनवर सांगत होती, ‘आई, आई, कसाबला फाशी दिली गं….’
गाढ झोपेत असलेल्या सुशीलकुमार यांच्या खोलीत जावून त्यांच्या पत्नी उज्ज्वलावहिनी त्यांना सांगू लागल्या, ‘अहो, उठा… उठा…. कसाबला फाशी दिली….’ झोपेतून जागे होवून सुशीलकुमार म्हणाले….. ‘तीच सगळी व्यवस्था करण्याकरिता मी संपूर्ण दिवस आणि रात्रभर बाहेर होतो.’ उज्ज्वलावहिनी म्हणाल्या, ‘अहो, मग मला सांगायचं नाही का?’…. सुशीलकुमार शांतपणे म्हणाले, ‘गृहमंत्री म्हणून मी घेतलेल्या शपथेमध्ये अशा घटना पत्नीलाही सांगायला मला कायद्याची परवानगी नाही…. आता तुला कळले ना, मी कुठे गेलो होतो ते….’
कसाबला फाशी झाली…. याची जाहिरातबाजी कधीही केली गेली नाही. नंतरच्या माेदी सरकारने अशाच एका अतिरेक्याला फाशी दिले… तो ‘इव्हेंट’ म्हणून देशभर साजरा झाला. सुशीलकुमारच्या वेळचे सरकार …. त्यावेळचे पंतप्रधान …. त्यावेळचे गृहमंत्री आणि आताचे हे सगळं सरकार यामध्ये एवढा मोठा फरक आहे…. आताची सरकारे जाहिरातबाजीवर चाललेली आहेत.
सुशीलकुमार यांचा ७५ वा वाढदिवस सोलापुरात त्यावेळचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी त्यांच्या हस्ते संपन्न झाला….
आयुष्याची ८१ वर्षे रविवारी पूर्ण करीत असताना सुशीलकुमार राजकारणापासून काहीसे अलिप्त आहेत…. राजकारणात असतानाही त्यांनी जीवनाचा आनंद सातत्याने घेतला. कला, साहित्य, संस्कृती, क्रीडा या सगळ्या विषयांत त्यांना आनंद आणि रूची अाहे… त्यांचे वाचन अफाट आहे… महाराष्ट्रातील सगळ्यात जास्त मराठी पुस्तकांचे प्रकाशन ज्यांच्या हस्ते झाले ते नाव सुशीलकुमारच आहे. त्यांचे ‘सुशीलकुमार’ हे नाव सुद्धा त्यांनी अचार्य अत्रे यांच्या ‘लग्नाची बेडी’ या नाटकात काम करण्यासाठीच घेतलेले होतेे. त्यावेळी दिलीपकुमार, राजेंद्रकुमार ही नावे कमालीची प्रसिद्ध होती. म्हणून यांनी नाटकात काम करण्यासाठी नाव घेतले ‘सुशीलकुमार’ अाणि तेच नाव पुढे राजकारणात त्यांनी यशस्वीपणे मिरवले. मुळचा सोलापूरचा ‘ग्यानबा’…. महाराष्ट्राला आणि देशाला ‘सुशीलकुमार’ म्हणून प्रख्यात झाला….जीवनात ते तृप्त आहेत…
समाजाने आणि काँग्रेसने मला खूप काही दिले आहे… कल्पनाही केली नव्हती अशा पदांवर मला काम करता आले. ही भावना ते नेहमी व्यक्त करतात आणि त्यांच्या प्रत्येक निर्णयात गरीब माणूस मी डोळ्यांसमोर ठेवला, हे ते अिभमानाने सांगतात… देशाचे सगळे नेते, सगळे विरोधी नेते यांच्याबद्दल कृतज्ञातेची भावना ते व्यक्त करतात… इंदिरा गांधी, सोिनया गांधी, राजीव गांधी अशा सर्वांशी जवळचा संबंध आल्याबद्दल त्यांनी आपली कृतज्ञाता नेहमीच व्यक्त केली. त्यांच्या पत्नी सौ. उज्ज्वला वैद्य यांनी त्या काळात अांतरजातीय विवाह करून क्रांतीकारी निर्णय केला. त्याचे वर्णन करताना सुशीलकुमार म्हणतात की, ‘माझ्यापेक्षा जास्त धोका तिनेच पत्करला आहे…. आणि आयुष्यभर मला साथ दिली.’ कुटुंबाबद्दल…. महाराष्ट्राबद्दल आणि सर्व नेत्यांबद्दल त्यांनी त्यांची कृतज्ञाता नेहमीच व्यक्त केली आहे.असे हे सदाबहार सुशीलकुमार….
रविवारी ८१ व्या वर्षात पाऊल ठेवून सहस्त्रचंद्र दर्शन सोहळा साजरा करणार आहेत…. या ८१ वर्षांत सुरुवातीच्या २५ वर्षांत सूर्याच्या प्रखर उष्णतेसारखे आयुष्यात चटके सहन करून त्यावर मात करणाऱ्या सुशीलकुमार यांच्या आयुष्यात १९७४ नंतर त्यांच्याच कतृत्त्वामुळे पौर्णिमेच्या शीतल चांदण्याचा अनुभव त्यांना घेता आला. आणि तोच शीतल चांदण्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर सदैव कायम आहे…. सहस्त्रचंद्र दर्शन सोहळ्याचा त्यांना आणि त्यांच्या मित्रांना जसा आनंद आहे…. त्याचप्रमाणे त्या चंद्रालासुद्धा आपल्यासारख्या शीतल मित्राच्या या वाढदिवस दिनी निश्िचतच आनंद वाटेल. दोघांच्याही शीतलपणामध्ये जरासाही फरक नाही. चंद्राला तापलेले कोणिही बघितलेले नाही. सुशीलकुमार िचडले, संतापले, अपशब्द बोलले…. असेही कधीही कोणाला दिसले नाही. त्यामुळे असे फार थोडे लोक असतील ज्यांच्या सहस्त्रचंद्र दर्शन सोहळ्याचा आनंद खुद्द चंद्रालाही होत असेल. रविवारची रात्र दोन चेहऱ्यांच्या आनंदाची रात्र आहे.
सुशीलकुमार यांना मन:पूर्वक शुभेच्छा….
– मधुकर भावे