स्पर्धेच्या काळात पतसंस्थेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नवीन आव्हाने व बदल स्वीकारावे -भाऊ पाटील नवले

भाऊसाहेब वाकचौरे
रुंभोडी प्रतिनिधी
अकोले तालुक्याच्या सहकार क्षेत्रात पतसंस्था या अत्यंत पारदर्शकपणे चालल्या आहेत, स्पर्धेच्या काळात भविष्यातील गोष्टींचा विचार करून पतसंस्थांना नवे बदल स्वीकारावे लागेल असे प्रतिपादन जनलक्ष्मी पतसंस्थेचे चेअरमन व अकोले तालुका पतसंस्था फेडरेशन चे अध्यक्ष भाऊ पाटील नवले यांनी केले
ते पुढे म्हणाले की सहकार खात्यात अथवा कोर्टात जाऊन प्रश्न सोडवता येणार नाही तर प्रत्येक गोष्टीचा सातत्याने पाठपुरावा करावा लागेल यात प्रामुख्याने सर्व जबाबदाऱ्या व्यवस्थापनाच्या आहेत व्यवस्थापनाच्या बऱ्याच निर्णयावर या सर्व गोष्टी अवलंबून असतात संस्थेच्या वसुलीचा फॉलप कर्मचाऱ्यांकडे असतो त्या कामाचे मूल्य कर्मचाऱ्यांनाच कळत असते त्या कामाच्या मोबदल्यात त्यांचे मूल्य त्यांना दिले जाते आता संस्थेत बसून काम न करता सर्वांनी अत्यंत तत्परतेने काम करावे स्पर्धेत ग्राहकांना व सभासदांना शनिवारी सुद्धा सेवा दयावी लागणार आहे अनेक संस्था पतसंस्था 365 दिवस चालू असतात ग्राहकांची सेवा व सभासदांची गरज म्हणून या सर्व गोष्टी भविष्यात स्वीकाराव्या लागतील यासाठी पतसंस्थेच्या तालुक्यातील सर्व अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी प्रत्येक पतसंस्थेत गेले पाहिजे विचार विनिमय विचारमंथन झाले पाहिजे सर्वांनी समन्वय ठेवून काम करावे असेही ते म्हणाले
अगस्ती ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या 38 व्या वार्षिक सभेच्या प्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते
मुख्य व्यवस्थापकांनी ग्रामीण भागातील सर्व शाखांना सातत्याने भेटी दिल्या पाहिजे त्या ठिकाणी शाखेचे मोडिफिकेशन अथवा नूतनीकरण या गोष्टीकडे जाणीवपूर्वक लक्ष दिले पाहिजे त्याचबरोबर कर्जदारांनी आपले कर्ज संस्थेत वेळेत भरले पाहिजे संस्थेचा नावलौकिक हा संस्थेच्या वसुलीवर असतो तालुक्यातील एखादी पतसंस्था अडचणीत असेल तर आम्ही ती संस्था दत्तक घेऊ व तिचे पालकत्व स्वीकारू असे ठाम आश्वासन त्यांनी सहकार चळवळीतल्या अडचणीत आलेल्या संस्थांना केले

वार्षिक सभेच्या अध्यक्षस्थानी अगस्ती पतसंस्थेचे चेअरमन श्री अशोकराव देशमुख होते यावेळी जिल्ह्याचे सहकार नेते तथा अगस्ती कारखान्याचे चेअरमन सिताराम पाटील गायकर, बाळासाहेब भोर,कचरू पाटील शेटे,लक्ष्मी पतसंस्थेचे चेअरमन प्रवीण मालुंजकर, अर्थवेध पतसंस्थेचे बी एम महाले सर, कैलासराव शेळके, संदीप शेटे, प्रकाश नाईकवाडी, तुकाराम उगले, शिवराम भोर,वसंतराव मनकर, उपाध्यक्ष गणेशराव मारुती शेठ भिंगारे, शिवाजी गोंदके रावसाहेब भोर, गुलाबराव शेवाळे,गुलाबराव आरोटे, दत्ता धुमाळ,अक्षय पोखरकर,पद्माताई गायकवाड, सुरेखाताई नाईकवाडी, सुरेश देशमुख, निलेश गायकर, अनिल कोळपकर आदी मान्यवर उपस्थित होते
अशोकराव देशमुख म्हणाले की संस्थेने अत्यंत पारदर्शक काम करून ठेवीच्या रकमेत वाढ झाली वसुली 35 कोटी झाली सभासदांनी वेळेवर कर्ज भरण्याची आवाहन त्यांनी केले
जिल्हा बँकेचे संचालक सिताराम पाटील गायकर यांनी कर्जदारांच्या नावावरची साडेसातशे एकर जमिनीला र लागल्याने याबाबत पदाधिकाऱ्यांनी ठोस निर्णय घ्यावा असे सांगितले
यावेळी वसंतराव मनकर, बाळासाहेब भोर, अनिल गायकवाड, प्रमोद मंडलिक, यांची भाषणे सूत्रसंचालन प्रमोद मंडलिक यांनी केले अहवाल वाचन संस्थेचे मुख्य सचिव दिलीपराव उदमले यांनी केले सर्व प्रश्नांना संस्थेचे अध्यक्ष अशोकराव देशमुख यांनी समर्पक उत्तरे दिली वार्षिक सभेस मोठ्या प्रमाणात सभासद उपस्थित होते आभार अक्षय पोखरकर यांनी मानले



