नगर- पुणे महामार्गावरील म्हसणे टोलनाका कायम स्वरुपी बंद करा – अविनाश पवार

अन्यथा जिल्हाधिकारी यांच्या दालनात उपोषणास बसणार
दत्ता ठुबे
पारनेर प्रतिनिधी:-
अहमदनगर-पुणे महामार्ग अपघात-अतिक्रमण, वाहतूक कोंडी मुक्त करावा या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने अनेक वेळा महामार्गावरील असुविधां विषयी आवाज उठवला मात्र सार्वजनिक बांधकाम ,विभाग व संबंधित टोल कंपनी यांना आंदोलनाचे इशारे देण्यात आले तत्कालीन पोलिस निरीक्षक नितीन कुमार गोकावे यांचे मध्यस्थीने सुपा पोलिस स्टेशन येथे संबंधित विभागाच्या अधिकारी वर्गाची बैठक झाली
तरी सुद्धा प्रांताधिकारी सह तहसीलदार यांच्या सोबत चर्चा बैठक पे बैठक अतिक्रमण धारकांना नोटीस काढुन सुद्धा सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांचे काही आर्थिक संबंध आहेत की काय हे न उलगडलेले कोडे आहे या सर्व गोष्टी चा संबंधित विभागाकडे पाठपुरावा करुन सुद्धा संबंधित अधिकारी हे गांभीर्याने न घेता निवेदनाला केराची टोपली दाखवणार असतील तर हे दुर्दैवी आहे असा आरोप करण्यात आला आहे
या नगर-पुणे महामार्गावर १३वर्ष टोलवसुली करुन बंधनकारक मुलभुत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी अपयशी ठरलेला चेतक एंटर प्रायजेस म्हसणे फाटा टोलनाका अाता कोणत्याही प्रकारची सवलत न देता त्वरित महसुल प्रशासनाने बंद ( सील ) करावा कारण निकृष्ठ दर्जाच्या कामामुळे सतत अपघात होऊन अनेक निरपराध कुटुंब उध्वस्त होत आहेत तर अनेक नागरिकांना अपंगत्व प्राप्त झाले आहे या रोडवर निरपराध नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे ,महामार्गावर रक्त सांडते आहे.अनेक वेळा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने पञव्यवहार करुन पण सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व चेतक एंटरप्रायजेस म्हसणे फाटा टोलनाका अधिकारी महामार्गावर रक्त सांडलं जात असताना सुद्धा जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत त्यामुळे १५ दिवसात याला जिम्मेदार असणा-या कंपनी व्यवस्थापनावर गुन्हा दाखल होऊन प्रत्यक्ष कार्यवाही झाली नाही तर कोणतीही पुर्व सुचना न देता शेवटचा पर्याय जोपर्यंत हा टोलनाका कायम स्वरुपी बंद होत नाही तोपर्यंत जिल्हाधिकारी अहमदनगर यांच्या दालनात उपोषणास बसणार असल्याचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माथाडी कामगार सेना जिल्हाध्यक्ष अविनाश पवार यांनी तहसीलदार पारनेर तसेच पोलिस प्रशासनाला दिला आहे.