जायनावाडीत तरूणांकडून ई पिक पहाणी करण्याचे ग्रामस्थांना आव्हान.

अकोले/प्रतिनिधी-
दर वर्षाप्रमाणे याही वर्षी नैसर्गिक आपत्तीमुळे भारतातील शेतकऱ्यांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागते. चक्रीवादळे, गारपीट, अतिवृष्टी आदि नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांची अपरिमित हानी होते. त्यासाठी सर्व शेतकऱ्यांना सरकारने १३ जानेवारी २०१६ रोजी एक योजनेचा शुभारंभ केला.कारण शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकाने प्रधानमंत्री पीक विमा योजना ( पीएमएफबीवाय ) सुरु केली.
अकोले तालुक्यातील सह्याद्रीच्या कुशीत वसलेले जायनावाडी हे गाव तस अति दुर्गम भागात वसलेले गाव आहे. त्यामुळे तेथील लोकांचा व्यवसाय शेती हा आहे. येथील शेतकरी दिवस रात्र मेहनत करुन वादळ, पाऊस, वाऱ्याची पर्वा न करता शेती करतात. परंतु गारपीट, अवकाळी पाऊस यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. यामुळे येथील शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसतो. त्यामुळे ई-पिक पहाणी लावणे येथील शेतकऱ्यांना अत्यंत गरजेचे आहे. यासाठी ग्रामपंचायत सदस्य बाजीराव भांगरे, सागर डगळे, सुभाष भांगरे, शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष हरिदास भांगरे,किसन भांगरे, यांनी गावातील शेतकऱ्यांना ई – पीक पहाणी लावण्यासाठी शेतकऱ्यांना आव्हान दिले. ज्या शेतकऱ्यांकडे मोबाईल नाही अश्या शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन ई-पीक लाऊन दिली. आणि सर्वांनी १५ सप्टेंबर पर्यंत ई-पीक करून घेतली पाहिजे असे आव्हान किसन भांगरे यांनी गावातील सर्व शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना केले. या स्तुत्य उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.