इतर

शिवनेरी किल्ल्यावरील ‘महादेव कोळी चौथरा’   राष्ट्रीय स्मारक झाले पाहिजे. -रामनाथ भोजने

अकोले प्रतिनिधी

  शिवनेरी किल्ल्यावरील ‘महादेव कोळी चौथरा’   राष्ट्रीय स्मारक झाले पाहिजे. अशी मागणी सह्याद्री सेवा संघाचे अध्यक्ष व अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे मुंबई प्रदेशाध्यक्ष रामनाथ भोजने यांनी केली आहे


त्यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की सह्याद्रीने महाराष्ट्राला महान देणगी दिली. मावळ प्रांत ते मुलुख मैदानी प्रदेशासाठी साथ दिल्ली ते देणारे आदिवासी महादेव कोळी, भिल्ल, ठाकर, कातकरी, गोंड समाजातील राजे दिले.
प्रजेने शिवरायांना मदत केली. सह्याद्री पर्वत हे महाराष्ट्राचे भूषण आहे. घाटमाथे, डोंगर, दऱ्या, कृष्णा, भिमा, गंगा, गोदावरी ह्या नद्या दिल्या. सिंहगड, शिवनेरी, रायगड, प्रतापगड, कोंढाणा दिला असे कोरीव लेणी, अचन, कांचन, करंवदीच्या काटेरी मुगुट दिला. कडे तोडणारे शूर कणखर मावळे दिले. राष्ट्र धर्म शिकवणारे कणखर मनाचे सह्याद्रीचे शिलेदार मायभूमीच्या रक्षणासाठी सीमा स्वराज्यांच्या स्वाभिमानासाठी छत्रपती शिवाजी महाराजांना अंगा खांद्यावर खिळवले. उभा महाराष्ट्र जागा केला. जय शंभो ! हर हर महादेव गर्जना करत शत्रूवर तुटून पडले. अशा शुर महादेव कोळी समजातील आदिवासी शूर वीर मावळ्यांना महाराष्ट्र विसरला, इतिहास विसरला आणि राज्यकर्तेपण विसरले. ही फार मोठी खेदाची बाब आहे.


कारण शिवनेरी किल्ल्यावर पुणे, चाकण, रायगड, प्रतापगड, कोंढाणा, किल्ला पट्टा किल्ला, जव्हार संस्थान, रतनगड, कुरुगंगड, हरिश्चंद्रगड, आशा २२ किल्ल्याचे किल्ल्यांच्या इतिहासात शिवनेरी मावळ प्रांताचा पहिला किल्ला या किल्ल्यावर ११७० ते १३१८ दरम्यान मुसलमान सरदारांच्या ताब्यात १४४३ ला मलिक अलतुजार ह्या बहमानी सरदाराने हा किल्ला महादेव कोळी आदिवासी सरदारांच्या ताब्यातून घेतला. तो पर्यंत शिवनेरी किल्ल्यावर महादेव कोळी सरदारांचे म्हणजे मावळ्यांचे राज्य होते. १६३७ च्या काळामध्ये शिवनेरी किल्ल्यावर मुसलमान राजवटीचे फार काळ वर्चस्व. राहिले. परतुं प्रत्यक्षात मात्र हा किल्ला महादेव कोळी सरदारांकडे (मावळ्यांकडे) होता. शिवशाहीचा उदय झाल्यावर महादेव कोळी लोकांना दहशत बसावी म्हणून शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी महादेव कोळ्यांची मोठी कत्तल झाली. त्यात हजारो मावळे मारले गेले. तो काळ १६५० होता. असा उल्लेख इतिहासात सापडतो.

शिवाई देवीची स्थापना किल्यावर महादेव कोळ्यांनी केली. तिचे नाव (शिवाईदेवी) तांदळादेवी म्हणून प्रसिद्ध आहे. ह्या देवीची स्थापना महादेव कोळी लोकांनी केली. किल्लेदार सरदार हे महादेव कोळी नाईक होते. सर्व किल्ले १६५० नंतर शिवाजी महाराजांच्या स्वाधीन केले. असे स्वाभिमानी मावळ्यांचा सरकारला विसर पडला असून १६ व्या शतकापासून ते २० व्या शतकापर्यंत हा इतिहास लुप्त आहे. तो जीवंत करायचा असेल तर शूर महादेव कोळी मावळ्यांचे शिवनेरी किल्ल्यावर शिरकाण झाले त्या ठिकाणी ‘महादेव कोळी चौथरा’ हे राष्ट्रीय स्मारक झाले पाहिजे.  अशी मागणी सह्याद्री  आदिवासी सेवा संघ, मुंबई व सह्याद्री युवक संघटना, पुणे यांनी केली आहे.

🔥 आदिवासी विरांना अभिवादान 🔥

जुन्नरचा शिवनेरी किल्ला हा केवळ शिवजन्मभूमीच नाही, तर आदिवासी वीरांच्या शौर्याचा साक्षीदार आहे. इथेच मुघलांविरुद्ध रणांगणावर उभे राहून 1600 आदिवासी वीरांनी प्राणांची आहुती दिली.
त्यांचे बलिदान हे आपल्या स्वाभिमानाचा इतिहास आहे, आपल्या अस्तित्वाचा पाया आहे!

👉 महादेव कोळी, ठाकर, कातकरी, भिल्ल, फासेपारधी या सारख्या अनेक आदिवासी जमातींचे वीर बंधू त्या काळात शिवनेरीच्या रणांगणावर उभे राहिले,अस्तित्वासाठी रक्त सांडीले आणि आज त्यांचे वंशज इतिहासाच्या या शौर्यभूमीवर अभिमानाने अभिवादन करतात.

✨ प्रत्येक वर्षीप्रमाणे, याही वर्षी
सप्टेंबर महिन्याच्या पहील्या रविवारी
आपण सर्व आदिवासी बांधव एकत्र येऊन या शौर्यस्मृतीला अभिवादन करणार आहोत.

⚔️ चला, या वीरांच्या रक्ताने पवित्र झालेल्या मातीत माथा टेकवूया!
⚔️ त्यांचा लढा, त्यांचे बलिदान आणि त्यांचा अभिमान पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवूया!

📍 स्थळ: शिवनेरी किल्ला, जुन्नर
🕙 वेळ: सकाळी 9.00 वाजता
दिनांक: 7 सप्टेंबर 2025 वार : रविवार

✊ राज्यभरातील सर्व आदिवासी बांधवांनो, चला!
आपल्या इतिहासाला, आपल्या वीरांना अभिवादन करूया!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button