खासदार निलेश लंके म्हणाले….तो पर्यंत मी कोणताही सन्मान स्वीकारणार नाही .

स्वातंत्र्य सेनानी सेनापती बापट स्मृती पुरस्कार वितरण संपन्न
दत्ता ठुबे /पारनेर प्रतिनिधी
– जोपर्यंत मी एखादे ठोस सामाजिक कार्य पूर्ण करत नाही, तोपर्यंत कोणताही सन्मान स्वीकारणार नाही, अशी ठाम भूमिका खासदार नीलेश लंके यांनी व्यक्त केली
.सोशल पारनेर सामाजिक संस्था व कृषी व जनसेवा प्रतिष्ठानतर्फे देण्यात आलेल्या स्वातंत्र्यसेनानी सेनापती बापट स्मृती पुरस्कारांचे वितरण खासदार लंके यांच्या हस्ते झाले . यावेळी ते बोलत होते.
ज्येष्ठ साहित्यिक साहेबराव ठाणगे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.नवनिर्वाचित नगराध्यक्षा डॉ.विद्या कवरे, उपनगराध्यक्षा सुप्रिया शिंदे यांचा यावेळी नागरी सत्कार करण्यात आला.
डॉ.रफीक सय्यद (आरोग्य व अध्यात्मिक कार्य),पारनेर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.रंगनाथ आहेर (शिक्षण, संस्कृती व पर्यावरण),पारनेर तालुका पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष संजय वाघमारे (पत्रकारिता, लेखन व सामाजिक चळवळ), सुरेश खोसे पाटील ( उत्कृष्ठ पत्रकारिता ), देवीदास आबूज(पत्रकारिता व साहित्य),प्रसाद तारे (शिवचरित्रकार), प्रकाश गाजरे (आदर्श गाव), मार्तंड बुचूडे (पत्रकारिता),अलका कदम (महिला सक्षमीकरण),गणपत वाफारे (समाजसेवा), राजेंद्र देशपांडे (समाजसेवा),अनिल भंडारी (समाजसेवा) यांना यांना स्वातंत्र्यसेनानी सेनापती बापट स्मृती पुरस्काराने गौरवण्यात आले.
कृषी व जनविकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष अरुणराव आंधळे, शिक्षक नेते रा.या.औटी, ज्येष्ठ विधीज्ञ पी.आर.कावरे, मारूती शेरकर, सोशल पारनेरचे अर्जून भालेकर, ॲड सोमनाथ गोपाळे, पत्रकार विनोद गायकवाड, श्रीनिवास शिंदे, भगवान गायकवाड, पत्रकार दिपक वरखडे, प्रा . डॉ . जाधव नंदकुमार दरेकर,विठ्ठल औटी, दिलीप भालेकर, संजय देशमुख, सुधाकर दरेकर,गौरव भालेकर,बिंदूराज भालेकर, वसिम राजे,साहिल शेख, सुभाष आग्रे आणि इतर उपस्थित होते.
सेनापती बापटांच्या पुण्यतिथीदिनी त्यांच्या जन्मस्थळावर त्यांना अभिवादन करणे म्हणजे क्रांतींची,समाजसेवेची प्रेरणा, उर्जा घेण्यासारखे आहे.सेनापती बापटांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधत, सोशल पारनेर,कृषी व जनविकास प्रतिष्ठानने पारनेर तालुक्यातील विविध क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या व्यक्तींचा सन्मान केला, ही पारनेरकरांच्या दृष्टीने अभिमानाची बाब आहे.यातील एकाही पुरस्कार्थींच्या कामाबाबत शंका उपस्थित केली जाऊ शकत नाही, असा विश्वास खासदार निलेश लंके यांनी व्यक्त केला.
अधक्षस्थानावरून बोलताना ज्येष्ठ साहित्यिक साहेबराव ठाणगे म्हणाले की,आपापल्या क्षेत्रात काम करणाऱ्या माणसाला पुरस्कार मिळाला किंवा पाठीवर थाप पडली, तरी ती खूप महत्वाची असते. त्यामुळे आणखी जोमाने काम करण्यास ऊर्जा मिळते. तरुण पिढीस या पुढील काळात नोकऱ्या मिळणार नाहीत, त्यासाठी त्यांनी स्वतःचे उद्योगधंदे सुरु करावेत.असे आवाहन ठाणगे यांनी केले.
कृषी व जनविकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष अरुणराव आंधळे म्हणाले की,सेनापती बापटांच्या विचारांना व समाजसेवेची प्रेरणा देणाऱ्यांना प्रकाशात आणणे, हा या पुरस्काराचा हेतू आहे.

अर्जून भालेकर यांनी प्रास्ताविक केले.प्रा.अशोक शिंदे यांनी सूत्रसंचालन केले, तर अरूणराव आंधळे यांनी आभार मानले.
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य कार्यकारिणी सदस्य तथा नगर जिल्हा सचिव सुरेश खोसे पाटील यांना स्वातंत्र्य सेनानी सेनापती बापट यांच्या स्मृती दिनानिमित ” उत्कृष्ठ पत्रकार ” हा सन्मान, सन्मान चिन्ह, शाल व एक कवितेचे पुस्तक देत खा. निलेश लंके यांच्या हस्ते देत, त्यांच्या ग्रामीण भागातील उत्कृष्ठ पत्रकारितेची व स्पष्ट वक्ते पणाची प्रशंसाही खा. लंके यांनी केली .



