घाटघर येथे संगमनेर महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यापीठ स्तरीय शिबिर सम्पन्न .

विलास तुपे
राजूर/ प्रतिनिधी
आदिवासी लोकांचे जीवनमान वाचणे व अनुभवणे यात फरक आहे, असे मत रुपेश गावित, वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी मांडले .सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, राष्ट्रीय सेवा योजना व संगमनेर महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “आदिवासी: लोककला, लोकनृत्य व लोकसंगीत” या तीन दिवसीय विद्यापीठ स्तरीय शिबिराच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते
अकोले तालुक्यातील आदिवासी भागात असणाऱ्या घाटघर येथे संगमनेर महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यापीठ स्तरीय शिबिर नुकतेच पार पडले .
या शिबिरासाठी अहिल्यानगर नासिक व पुणे या तीन जिल्ह्यातून एकूण ११० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता . या शिबिरासाठी संगमनेर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण गायकवाड, वन परिमंडळ अधिकारी शंकर लांडे, वनरक्षक अरुण कोरडे ,प्रविण साळुंके, रासेयो विभागीय समन्वयक म्ह्तु खेमनर, विद्यार्थी विकास मंडळाचे जिल्हासमन्वयक डॉ. प्रताप फलफले, भूगोल विभाग प्रमुख डॉ. रविंद्र गायकवाड, शिबिर समन्वयक प्रा. संदीप देशमुख, रासेयो अधिकारी डॉ. अशोक तांबे, प्रा. शितल गायकवाड उपस्थित होते.

शिबिरामध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी आदिवासी बांधवांचे जनजीवन कशा पद्धतीने असते याची प्रचिती घेतली असुन साम्रद येथील प्रत्येक घरामध्ये जाऊन आदिवासी बांधव कशा पद्धतीने आपली उपजीविका करतात याची माहिती घेतली . याशिवाय आदिवासी बांधवांची लोककला प्रत्यक्षात अनुभवत लव्हाळवाडीतील पथकाने सादर केलेले आदिवासी नृत्य विद्यार्थ्यांसमोर लव्हाळवाडीतील पथकाने सादर केले . . शिबिराच्या समारोपप्रसंगी प्रमुख पाहुणे असलेले वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आदिवासी बांधवांचे जीवन वाचणे आणि प्रत्यक्षात अनुभवणे यामध्ये फरक असल्याचे सांगितले . तर महाविद्यालयाचे प्राचार्य . डॉ . अरुण गायकवाड यांनी भंडारदराचे पर्यटन हे आदिवासी बांधवांचे जनजीवन सुधारण्यासाठी निश्चितच महत्त्वाचे असुन भंडारदर्याच्या पर्यटनाला जर आणखी चांगले चालना दिली गेली तर आदिवासी बांधवांचा आर्थिक स्रोत उंचावणारा असुन या भागामध्ये जास्तीत जास्त पर्यटक कसे येतील याकडे प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे सांगितले .
या समारोप कार्यक्रमाचे प्रस्ताविक डॉ. अशोक तांबे यांनी, डॉ. प्रताप फलफले यांनी प्रमुख उपस्थित पाहुण्याचा परिचय व सत्काराचे निवेदन केले. या शिबिराचे अहवाल वाचन शिबिर समन्वयक प्रा. संदीप देशमुख यांनी केले. प्रा. शितल गायकवाड यांनी आभार मानले. सूत्रसंचालन प्रसाद सांगळे व ईश्वरी आगलावे यांनी केले. या शिबिरात डॉ. शरद पारखे, , प्रा. गणेश साळुंके , प्रा. शंकर राशिनकर, काशीनाथ गांगड, श्री ऋषी कोल्हे यांनी सहभाग घेतला. प्रा. नामदेव बांगर, महेंद्र पाटील वनरक्षक, रमेश खडके, माधव वाघ, कैलास खडके व संगमनेर महाविद्यालयातील रासेयो स्वंयसेवक यांचे अनमोल सहकार्य लाभले.