अहमदनगर

मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत वाढदिवस साजरा करणार नाही -डॉ-कृषीराज टकले यांचा संकल्प

अहमदनगर प्रतिनिधी
मराठा समाजाचे सोडविण्यात कोणत्याही पक्षाला किंवा नेत्याला स्वारस्य दिसत नाही मराठा समाजाला नुसते आश्वासनांवर झुलवत ठेवण्याचे काम आतापर्यंत सर्व़ांनी केले आहे
मराठा आरक्षणासारखा गंभीर प्रश्न सरकार सोडवू शकले नाही त्यामुळे मराठा आरक्षण जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत स्वत:चा वाढदिवस साजरा करणार नाही असा संकल्प स्वाभिमानी मराठा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष डॉ कृषिराज टकले यांनी केला आहे
मराठा समाजातील सुशिक्षित तरूणांना नौकऱ्या नाही हाताला रोजगार नाही त्यामुळे मुलांचे लग्न सुध्दा वेळेवर होत नाही अशा मराठा तरुणवर्ग सापडला आहे आरक्षण मराठा समाजाला तारक ठरले असते मात्र त्याचाही वेळकाढुपणा सरकार करत आहे मराठा समाजातील तरुणांच्या व शेतकऱ्यांच्या इतक्या आत्महत्या होवूनही सरकार आरक्षणाच्या बाबतीत उदासीन आणि झोपेचे सोंग घेतलेले आहे
90% मराठा समाज शेतीवर अवलंबून आहे शेतीमालाला हमीभाव नाही कष्ट करून उत्पादन खर्च सुध्दा निघत नसल्या मुळे शेतकरी कर्जबाजारी होऊन आत्महत्या करत लाखांचा पोशिंदा जिवंत ठेवायचा असेल तर शेतीमालाला हमीभाव मिळाला पाहिजे अशी मागणी सुध्दा स्वाभिमानी मराठा महासंघाचे डॉ, कृषिराज टकले यांनी केली 3 मे रोजी डॉ ,कृषीराज टकले यांचा वाढदिवस असतो मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत वाढदिवस नाही असे त्यांनी पत्रकादवारे जाहिर केले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button