अहमदनगर

समूह राष्ट्रगीत गायन उपक्रमात सर्व नागरिकांनी सहभागी व्हावे — अकोल्याचे तहसीलदार सतीश थिटे

अकोले प्रतिनिधी
बुधवार दिनांक 17 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 11 वाजता होणाऱ्या समूह राष्ट्रगीत गायन उपक्रमात अकोले तालुक्यातील सर्व नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन अकोल्याचे तहसीलदार सतीश थिटे यांनी केले आहे

भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होण्याच्या पार्श्वभूमीवर देशात सर्वत्र “आजादी का
अमृत महोत्सव” अर्थात “स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव” या उपक्रमाचे आयोजन करण्यात येत
आहे.

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवांतर्गत दिनांक ९ ऑगस्ट ते १७ ऑगस्ट, २०२२ या कालावधीमध्ये राज्यात “स्वराज्य महोत्सव” चे आयोजन करण्याचा निर्णय शासनाने घेतला आला आहे. “स्वराज्य महोत्सव” अंतर्गत राज्यस्तर /जिल्हास्तर / तालुकास्तर व ग्रामस्तरावर आयोजित करावयाच्या कार्यक्रम / उपक्रम यांचे स्वरुप निश्चित केले आहे.

“स्वराज्य महोत्सव” अंतर्गत कार्यक्रमांच्या नियोजनामधील “समूह राष्ट्रगीत गायन” हा उपक्रम दिनांक १७ ऑगस्ट, २०२२ रोजी सकाळी ११.०० वाजता राबवीला जात आहे। याअंतर्गत
दिनांक १७ ऑगस्ट रोजी सकाळी ११:०० वाजता एकाच वेळी सर्वत्र समूह राष्ट्रगीत गायन होईल, याची दक्षता घेण्यात यावी.. या राष्ट्रगीत गायनासाठी खाजगी, शासकीय तसेच इतर सर्व प्रकारच्या शाळा/ महाविद्यालये / शैक्षणिक संस्था/ यामधील विद्यार्थी, शिक्षक यांनी सहभागी व्हावे सकाळी ठीक ११:०० वाजता समूह राष्ट्रगीताला सुरुवात करून सकाळी ११:०० ते ११:०१ या एका मिनिटांमध्ये राष्ट्रगीत गायन करावे

समूह राष्ट्रगीत गायनाच्या वेळी राष्ट्रगीताचा अवमान होणार नाही ,याची दक्षता व विशेष काळजी प्रत्येक नागरिकाने घ्यावी.
सर्व नागरिकांना दिनांक १७ ऑगस्ट रोजी,सकाळी ११.०० वाजता आहे त्या ठिकाणी थांबून राष्ट्रगीत गायन करावे.. खाजगी आस्थापना, व्यापारी प्रतिष्ठाने, संस्था, शासकीय व निम शासकीय कार्यालये, केंद्र शासन व राज्य शासनाशी संबंधित कार्यालयातील अधिकारी /कर्मचारी यांनीही या उपक्रमात सक्रीय सहभाग घ्यावा
सर्व सरकारी / खाजगी शाळा,महाविद्यालये, विद्यापीठे, सर्व प्रकारच्या शैक्षणिक संस्था / शासकीय व निमशासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांना सदर उपक्रमात सहभागी होणे अनिवार्य आहे. राष्ट्रगीत गायनासाठी विद्यार्थ्यांनी मोकळे पटांगण, वर्ग खोली, किंवा हॉल या ठिकाणी एकत्रित उपस्थित राहावे, तसेच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, शैक्षणिक संस्थांचे पदाधिकारी यांनीही या उपक्रमात सक्रिय सहभागी व्हावे ग्राम स्तरावर, वॉर्ड स्तरावर सर्व अधिकारी व पदाधिकारी यांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन तहसीलदार सतीश थिटे यांनी केले आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button