इतर

काकणेवाडीच्या विकासासाठी कायम कटीबद्ध – लोकनेते आमदार निलेश लंके.

पारनेर तालुक्यातील
“काकनेवाडी त विकास कामाचे उदघाटन “


पारनेर प्रतिनिधी,
पारनेर तालुक्यातील काकनेवाडी येथे आमदार लोकनेते निलेश लंके यांच्या उपस्थितीत विविध विकास कामाचे उदघाटन करण्यात आले.
मागील कित्येक वर्षा पासून काकनेवाडी गावाशी माझी नाळ जोडलेली आहे. आमदार होण्या अगोदर ही माझा या गावाशी जिव्हाळ्याचा संबंध होता.यापुढील काळातही या गावच्या विकास कामा मध्ये जातीने लक्ष घालणार, असल्याचे आमदार लंके म्हणाले.
भूमिपूजन झालेल्या विकास कामामध्ये श्रीराम मंदिर समोर सभामंडप बांधणे -20लक्ष,टुबूक दरा पाझरतलाव दुरुस्ती करणे -16.28लक्ष,वाघदरा पाझर तलाव दुरुस्ती -18.3लक्ष,
भुज दरा ते खोडा वस्ती पानंद रस्ता खडिकरण आणि मुरमिकरण.24 लक्ष,
या कामाचे भूमी पूजन करण्यात आले.
यावेळी प्रमुख पाहुणे मा.प. स.सदस्य राजेंद्र चौधरी, अशोक घुले, अंकुश पायमोडे (राष्ट्रवादी तालुका उपाध्यक्ष )सुहास नगरे, प्रसाद नवले उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी मुंबईकर मंडळाचे प्रमुख आणि श्रीराम मित्र मंडळाचे अध्यक्ष जयवंतशेठ वाळुंज होते.हभप दादा भाऊ महाराज,वाळुंज हभप रंगनाथ महाराज वाळुंज,निलेश लंके प्रतीष्ठान चे अध्यक्ष संभाजी वाळुंज त्याच प्रमाणे मुंबईकर मंडळाचे सचिव सुभाष वाळुंज,नानासाहेब झावरे दत्तू नवले,दत्तात्रय वाळुंज.डॉ. मंगेश वाळुंज शांताराम नवले ग्रा. सदस्य बाळासाहेब वाळुंज, गोरख वाळुंज, सचिन वाळुंज,दिलीप वाळुंज, माधव शिंदे,सुभाष पवार प्रवीण वाळुंज, अनिल वाळुंज हे उपस्थित होते.महिला वर्गात सौ संगीता वाळुंज शारदा वाळुंज स्वाती वाळुंज. राष्ट्रवादी महिला आघाडीच्या तेजश्री वाळुंज मनीषा वाळुंज अरुणा वाळुंज उपस्थित होत्या.
तसेच यावेळी निलेश लंके प्रतिष्ठान शाखा काकनेवाडी कार्यालयचे उदघाटन करण्यात आले.
यावेळी राजेंद्र झावरे यांनी कार्यक्रम चे सूत्रसंचालन केले तर राहुल वाळुंज (अध्यक्ष शिवस्मारक समिती काकनेवाड यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.
यावेळी मा आमदारांना काकनेवाडी ग्रामस्थानच्या वतीने गोटीवस्ती ते तिखोल शिव रस्ता, कढणे वस्ती रस्ता, जी प शाळा पेविंग ब्लॉक, वॉल कंपाऊंड पाईन पाझर तलाव दुरुस्ती या नवीन कामांचे प्रस्ताव देण्यात आले.


काकनेवाडीच्या इति हासात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झाला असून शेतकऱ्यांच्या शेतीच्या पाण्याचा प्रश्न पाझर तलाव दुरुस्ती च्या माध्यमातून मार्गी लागल्या मुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे.”
—— संभाजी वाळुंज

.(अध्यक्ष निलेश लंके प्रतिष्ठान काकनेवाडी )

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button