अकोल्यात त्या अतिक्रमित जागेवर आंबेडकरांचे स्मारक करण्यासाठी भव्य आक्रोश मोर्चा !

जिल्हाभरातून आंदोलक सहभागी होणार!
अकोले प्रतिनिधी
अकोले शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक व्हावे या मागणीसाठी भव्य आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले या मोर्चात पक्ष व राजकारण बाजूला ठेवून सर्व समाज या मोर्चासाठी एकवटला असून भव्य दिव्य मोर्चा होणार असल्याचे आरपीआयचे नेते विजयराव वाकचौरे यांनी सांगितले
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारकाच्या मागणीसाठी होणाऱ्या या आक्रोश मोर्चाची माहिती देण्यासाठी अकोले येथे आज मंगळवारी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती यावेळी अरुण रुपवते, रमेश जगताप,राजेंद्र गवांदे, रमेश शिरकांडे, सुरेश देठे गौतम रोकडे आदी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते
त्यानी सांगितले की अकोले येथे कोल्हार – घोटी रोड लगत महात्मा फुले चौकाच्या शेजारी ५० वर्षापासुन बौद्ध समाजाची स्मशानभुमी आहे हि ३० गुंठे जागा असून त्यावर अतिक्रमण झाल्याने ती दुर्लक्षित राहिली याबाबत मोठा लढा दिल्यानंतर त्याला आता यश आले आहे या जागेवर आता विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक व्हावे या साठी हा आक्रोश मोर्चा आहे या मोर्चा साठी जिल्हा जिल्हाभरातून हजारो नागरिक सहभागी होणार आहे तालुक्यातील प्रत्येक गावातून महिला व पुरुष यात सहभागी होणार आहे
गुरुवारी दि.०५ जानेवारी २०२३ रोजी काढण्यात येणाऱ्या मोर्चात जिल्हा व राज्य भरातून हाजारो भीम सैनिक शिस्त संयमाने आणि शांततेने या मोर्चात सहभागी होणार आहे सर्व घटकांचा पाठिंबा घेत या मोर्चात दहा ते पंधरा हजार नागरिक सहभागी होतील असा अंदाज त्यांनी यावेळी व्यक्त केला
अकोले तालुक्यात डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा पदस्पर्श झालेला आहे या भूमीत त्यांच्या विचारांचे भव्य दिव्य स्मारक असावे अशी जनतेची अपेक्षा आहे तरुणांना समाजाला प्रेरणा देणारे महापुरुषांचे डॉ बाबासाहेबांचे भव्य दिव्य स्मारक असावे अशा दृष्टिकोनातून स्मारक समितीने या ठिकाणी भव्य दिव्य आदर्श असे स्मारक उभारण्याचा निर्णय घेतला असून आक्रोश मोर्चा कोणाच्याही विरोधात किंवा कोणाला टार्गेट करण्यासाठी नसून महापुरुषाचे विचार आणि प्रेरणांच्या स्मृती जपण्या साठी असल्याचे विजयराव वाकचौरे यांनी सांगितले

गुरुवारी सकाळी 11 वाजता मोर्चा हा पोलीस ग्राऊंड ते महात्मा फुले चौक असा जानार असून मोर्चाने जाऊन स्मारक समितीचे आंदोलक जागेचा राबा ताबा घेणार आहे असे वाकचौरे यांनी सांगितले