ज्यांनी पक्ष स्थापन केला त्यांचा पक्ष राहिला नाही निवडणुक आयोगाच्या निर्णयावर दाते सरांनी चिंता !

दत्ता ठुबे/पारनेर प्रतिनिधी
ज्यांनी पक्ष स्थापन केला त्यांचा नाही राहिला तर पक्षातून बाहेर गेलेल्यांचा पक्ष निवडणूक आयोगाने करून टाकला. याविषयी समाजात राग उत्पन्न झालेला आहे. राजकारणाचा नैतिक स्तर खूप खालवत चाललेला असल्याची चिंता जिल्हा परिषदेचे बांधकाम कृषी समिती सभापती काशिनाथ दाते यांनी व्यक्त केली
डोंगरी विकास अंतर्गत कारेगाव ता.पारनेर येथील स्मशानभूमी कडे जाणारा रस्ता करणे – १० लक्ष कामाचे भूमिपूजन जिल्हा परिषदेचे बांधकाम कृषी समिती सभापती काशिनाथ दाते सर यांचे शुभहस्ते संपन्न झाले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवसेना जिल्हा उपप्रमुख रामदास भोसले होते तर तालुकाप्रमुख डॉ. श्रीकांत पठारे, उपतालुका प्रमुख सुनिताताई मुळे यांची प्रमुख उपस्थिती होतीे.
यावेळी बोलताना सभापती काशिनाथ दाते म्हणाले, जिल्हा परिषदेमध्ये काम करत असताना मी कौशल्य वापरून डोंगरी विकास अंतर्गत असलेला ४५ लक्ष रुपयांचा निधी जिल्हाधिकारी यांच्याकडून मिळविला. पाडळी दर्या येथील काळेवाडी रस्त्यावर मोरी बांधकाम व खडीकरण करणेसाठी २५ लक्ष रुपये, कारेगाव स्मशान भूमीकडे जाणाऱ्या रस्त्याला १० लक्ष आणि नांदूर पठार येथील रस्त्यासाठी १० लक्ष असा निधी मिळवला. कारेगाव लहान परंतु माणसे सर्व मोठ्या मनाची आहेत, सर्व विकास कामासाठी एकत्र असतात. म्हणून गाव लहान असले तरी माजी आमदार विजय औटी त्यांच्याकडून तुम्ही कौशल्याने एवढा मोठा निधी मिळवला. त्यांनी एक कोटी रुपयांचा पाझर तलाव बंधारा केलेला आहे. गावात सोशल सेंटरच्या माध्यमातून, बचत गटाच्या महिलांच्या माध्यमातून फार मोठे काम झाले आहे. एखादे काम आपण जर कल्पकतेने केले तर लोक त्याची प्रेरणा कशी घेतात याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे जवळा गाव. या ठिकाणी गावांतर्गत चौक रस्ता करण्याकरीता मी २० लक्ष रुपयांचा निधी दिला. त्यांनी तो रस्ता तो दुतर्फा करून चौक सुशोभीकरण केला आणि या चौकात ५१ फुट उंचीचा छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा शिवजयंती निमित्त त्याचे अनावरण करून बसवला.
मला संधी खूप उशिरा मिळाली ४२ वर्ष मी समाजकारणात आहे. १९८० सालापासून सार्वजनिक जीवनाला सुरुवात केली. मी सातत्याने समाजात आहे लोकांच्या सुखदुःखात आहे. त्यामुळे काम करणारे कोण आहेत हे आता लोकांच्या लक्षात येईल आज राजकारणाचा नैतिक स्तर खूप खालवत चाललेला आहे. निवडणूक आयोगाने ज्यांनी पक्ष स्थापन केला त्यांचा नाही राहिला तर पक्षातून बाहेर गेलेल्यांचा पक्ष करून टाकला. याविषयी समाजात राग उत्पन्न झालेला आहे. जे चाललंय ते चांगलं नाही. परंतु असू द्या हे गाव खूप चांगलं आहे येथून मला भरभरून मतदान झाले आहे उद्याच्या काळात तुम्ही जे काम सांगताना त्यामध्ये कसलीही टाळाटाळ केली जाणार नाही. कामाची काळजी करू नका, असे दाते सर म्हणाले
यावेळी तालुकाप्रमुख डॉ. श्रीकांत पठारे, महिला उप तालुका प्रमुख सुनिता मुळे, सरपंच बापुराव ठुबे, ग्राम. सदस्य गंगाराम घुले, माजी सरपंच साहेबराव खरात यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

(
: एक वर्ष झाले निवडणूक नाही तरीही दाते सरांची उद्घाटने चालू आहेत. सरांनी मंजूर केलेल्या कामांचीच उद्घाटन केली. नाही तर आगामी काळात निवडणुकीच्या आदल्या दिवशी गाजरं दाखवणारे येतील, बोकडाचं आमंत्रण येईल, परंतु आता हे चालणार नाही, तालुक्यात उद्घाटने करून कामे न झालेली किती बोर्ड लोकांनी काढून टाकले हे पहा, चांगल्या लोकांच्या मागे उभे रहा
: रामदास भोसले, शिवसेना जिल्हा उपप्रमुख)
यावेळी सरपंच बापूराव ठुबे, उपसरपंच अनिता पंडित, ग्राम. सदस्य गंगाराम घुले, दत्ता घुले, सुभाष खरात, ज्ञानेश्वर घुले , शाखाप्रमुख शरद जगदाळे, सविता राजदेव, सावकार मुळे, बाळासाहेब घुले, विष्णू घुले, विनायक घुले, देवस्थान अध्यक्ष काशिनाथ घुले, अजित घुले, भास्कर खरात, अशोक खरात, साहेबराव खरात, अशोक पंडित, संजाबाई घुले, पूनम घुले अरुणा गुंजाळ, तुकाराम ठुबे, महेश गुंजाळ, रामदास घुले, योगेश घुले, संदीप घुले, राजू गुंजाळ, संपत ठुबे, तान्हाजी मुळे, लक्ष्मण घुले, ठकाभाऊ घुले, रवींद्र गुंजाळ, दादाभाऊ घुले, बाबाजी खरात, अनिल घुले, पोपट ठुबे, गणपत मुळे, बाळशिराम घुले, बाजीराव घुले, सखाराम खरात, संदीप घुले, शिवाजी गुंजाळ, विष्णू खरात, प्रवीण घुले, ग्रामसेवक हरिष भालेराव इत्यादी मान्यवर उपस्थितीत होते. प्रास्ताविक काशिनाथ घुले यांनी केले, सूत्रसंचालन दत्ता घुले यांनी तर आभार सखाराम ठुबे सर यांनी मानले.