इतर

रानभाजी आपल्या रोजच्या आहाराचा भाग असला पाहिजे – योगेश नवले 

वाकी (ता अकोले) येथे रानभाज्यांचे प्रदर्शन संपन्न

 –

 अकोले प्रतिनिधी

  ए.एस.के. फाउंडेशन, मुंबई यांच्या पुरस्काराने आणि बायफ (BISLD), नाशिक संचालित समृद्ध शेतकरी प्रकल्पाअंतर्गत वाकी ता अकोले येथे रानभाजी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात प्रकल्पातील गावांतील महिला, शेतकरी, ग्रामपंचायत पदाधिकारी आणि तज्ज्ञांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते .

 या मेळाव्यात ५५ हून अधिक प्रकारच्या पारंपरिक रानभाज्यांचे सुंदर प्रदर्शन भरवण्यात आले होते. गुहिरे, रंधा, मूतखेल, बारी, जहागीरदारवाडी, मुरशेत आदी गावांतील महिला शेतकऱ्यांनी घरगुती बनवलेल्या रानभाज्यांनी लक्ष वेधून घेतले .

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ए.एस.के फाउंडेशनचे प्रकल्प  व्यवस्थापक अरुण बांबळे, कृषी विज्ञान केंद्र, बाभळेवर येथील मृदशास्त्रज्ञ शांताराम सोनवणे, पशुधन प्रमुख डॉ. विठ्ठल विखे, वनपुरुष तुकाराम गभाले, वाकीचे सरपंच राजाराम झडे, रंधा गावचे सरपंच सुंदरलाल भोईर, गुहिरेचे सरपंच गजानन कातडे, उपसरपंच सुनील सारूक्ते, ग्रामविकास समितीचे अध्यक्ष, सचिव, तसेच जिल्हा परिषद शाळा व माध्यमिक विद्यालय वाकी येथील शालेय विद्यार्थी , मुख्याध्यापक ,उपशिक्षक उपस्थित होते.

रानभाजी – आपल्या आरोग्याचे वरदान 

डॉ. विठ्ठल विखे यांनी रानभाजीतील पोषक घटक आणि त्यांच्या आरोग्यदायी उपयोगांबद्दल माहिती दिली. तुकाराम गभाले (वनपुरुष) यांनी रानभाज्यांचे पारंपरिक ज्ञान,उपयोग आणि पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या सवयी विषद केल्या.  तर राम कोतवाल यांनी सांगितले की, “आज रानभाज्या दुर्मिळ होत आहेत. त्यांचे जतन, प्रचार, आणि लागवड अत्यंत आवश्यक आहे. सुकवलेल्या रानभाज्या वर्षभर वापरता येतात. शहरांमध्येही त्यांचा प्रसार करायला हवा.

” उपसरपंच सुनील सारूक्ते यांनी रानभाजी लागवडीचे क्षेत्र वाढवण्यावर भर दिला, तर बाळू घोडे यांनी महिलांना व विद्यार्थ्यांना विषमुक्त व पारंपरिक आहाराचे महत्त्व समजावून सांगितले. पूर्वीच्या विषमुक्त आहाराचा आजच्या रेडीमेड अन्नाशी तुलना करत, सर्व तज्ज्ञांनी तरुण पिढीला रानभाज्यांविषयी जागरूक करण्याची गरज व्यक्त केली.

या कार्यक्रमाचे आयोजन ए.एस.के. फाऊंडेशन मुंबई चे सहाय्यक उपाध्यक्ष सिद्धार्थ अय्यर, प्रकल्प व्यवस्थापक अरुण बांबळे, बायफ संस्थेचे मुख्य कार्यक्रम व्यवस्थापक प्रदीप खोसे, वरिष्ठ कार्यक्रम व्यवस्थापक सुरेश सहाणे यांच्या तांत्रिक मार्गदर्शनाखाली करण्यात आले. अगस्ती चासकर,नयना सगभोर, काजल देशमुख, वर्षा भागडे, तसेच ग्रामविकास समितीचे अध्यक्ष, सचिव व सदस्य यांनीही कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोलाचे योगदान दिले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रकल्प प्रमुख विष्णू चोखंडे यांनी केले, तर सूत्रसंचालन मच्छिंद्र मुंढे तर योगेश नवले यांनी उपस्थितांचे  आभार मानले.

*“रानभाजी ही केवळ परंपरेची शिदोरी नाही, तर आजच्या पिढीसाठी आरोग्य आणि शाश्वत जीवनशैलीची हमी आहे. रानभाज्यांचे संवर्धन ही काळाची खरी गरज आहे. या मेळाव्यामुळे लोकांना परंपरागत अन्नसंस्कृतीचे महत्त्व समजले. ग्रामस्थ, शेतकरी, महिला बचतगट आणि तरुणांचा सहभाग वाढला, तर रानभाजीचे जतन, लागवड आणि वापर या तिन्ही आघाड्यांवर मोठा बदल होईल. शालेय मुलांना आणि तरुणांना रानभाजीची ओळख करून देणे हाच मुख्य हेतू या मेळाव्याचा होता.रानभाजी टिकवणे म्हणजे पुढच्या पिढ्यांच्या आरोग्याची काळजी घेणे. पुढील काळात बायफ संस्थेच्या माध्यमातून अकोले तालुक्यात जैवविविधता संवर्धनाची मोठी चळवळ उभारण्याचे नियोजन आहे.”

योगेश नवले

जैवविविधता प्रकल्प समन्वयकबायफ – BISLD, अकोले

————

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button