इतर

प्रवरा नदी उगम ते अमृतेश्वर मंदिर परिसर स्वच्छता व नदी परिक्रमा शिबिर’ संपन्न

डाॕ.डी.वाय पाटील महाविद्यालयाचा उपक्रम


विलास तुपे

राजूर/प्रतिनिधीः

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, राष्ट्रीय सेवा योजना आणि  डाॕ डी.वाय.पाटील युनिटेक सोसायटीचे, डाॕ.डी.वाय पाटील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, आकुर्डी यांच्या संयुक्त विद्यमाने मौजे रतनवाडी, कळसूबाई-हरिश्चंद्रगड-अभयारण्य येथे विद्यापीठस्तरीय  प्रवरा नदी उगम ते अमृतेश्वर मंदिर परिसर स्वच्छता व नदी परिक्रमा शिबिर पार पाडले.
          २६ फेब्रुवारी ते १ मार्च २०२५   या दरम्यान झालेल्या शिबिरात  पुणे, अहिल्यानगर आणि नाशिक या तीन जिल्हयातून १८७ विद्यार्थ्यांनी व १० प्राध्यापकांनी सहभाग नोंदवीला. या शिबिरात सर्व विद्यार्थ्यांनी रतनगडचे ट्रेकिंग केले. तसेच रतनगडावर जंगलातून गडावर जाणाऱ्या मार्गाची स्वच्छता करण्यात आली. सदर कालावधी रतनवाडी येथे अमृतेश्वराचे जे देवस्थान आहे त्याची महाशिवरात्रीच्या दिवशी यात्रा असते. यात्रेनंतर झालेली कचऱ्याची स्वच्छता दरवर्षी प्रमाणे याही वर्षी करण्यात करण्यात आली. रतनगडावरती असलेले प्रवरा नदीचे उगम स्थान  व रतगडाची  माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली.


       शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून रतनवाडी गावचे माजी सरपंच श्री. दगडू पांढरे पाटील, रतनवाडी गावच्या सरपंच सौ. धनश्री झडे, श्री. हिरामन झडे हे उपस्थित होते. या प्रसंगी श्री. पांढरे पाटील यांनी मार्गदर्शन करताना आपल्या गावात होत असलेल्या शिबिराविषयी आनंद व्यक्त केला. हिरामन झडे यांनी  विद्यार्थ्यांमध्ये नैतिक मूल्य रुजवण्यासाठी अशी शिबिरे फार महत्वाची असतात असे मत मांडले . तत्पूर्वी प्राचार्य डॉ. मोहन वामन यांनी या समारंभाचे प्रास्ताविक करताना या भागात शिबिरे हे विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास व्हावा, आदिवासी संस्कृतीची, जैवविविधतेची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी तसेच विद्यार्थ्यांमध्ये धाडस निर्माण व्हावे. या उद्देशाने आयोजित केले जातात असे सांगीतले.
      शिबिराच्या समारोपप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून संगमनेर महाविद्यालय, वनस्पतीशास्त्र विभागाचे विभागप्रमुख डॉ. महेंद्र ख्याडे, प्रा. सुभाष वर्पे आणि प्रा. ओंकार थोरात  हे उपस्थित होते. या प्रसंगी डॉ. महेंद्र ख्याडे यांनी नदीचे महत्व सांगून प्रवरा नदी व नदी परिक्रमेविषयी विद्यार्थ्याना माहिती दिली. तर अनेक विद्यार्थ्यांनी शिबिरातील आपले अनुभव यावेळी व्यक्त केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षिय मार्गदर्शनामध्ये प्राचार्य डॉ. मोहन वामन यांनी विद्यार्थ्यांना आपल्या पारंपारिक लोकसंस्कृतीची माहिती व्हावी. स्वावलंबन, स्वयंशिस्त हे मूल्य विद्यार्थ्यांमध्ये रुजावे व स्वच्छतेचे महत्व विद्यार्थ्यांना कळावे यासाठी अशा शिबिराचे आयोजन केले जाते असे मत व्यक्त केले. प्रा. भागवत देशमुख यांनी सूत्रसंचालन केले तर रा. से. यो. कार्यक्रम अधिकारी डाॕ. खालिद शेख यांनी आभार मानले.


           या कार्यशाळेचे व शिबिराचे आयोजन संस्थेचे अध्यक्ष मा. डॉ. पी. डी. पाटील सर, उपाध्यक्ष मा. डाॕ. भाग्यश्रीताई पाटील, सचिव मा. डॉ. सोमनाथ पी. पाटील, खजिनदार  डाॕ. रोहिणी पाटील,  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, राष्ट्रीय सेवा योजनेचे, संचालक डाॕ. सदानंद भोसले आणि प्राचार्य डाॕ. मोहन वामन यांच्या  मार्गदर्शनाखाली या कार्यशाळेचे व शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
      या उपक्रमाच्या नियोजनात विद्यार्थी विकास अधिकारी डाॕ. मुकेश तिवारी, रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. खालीद शेख, डॉ.मीनल भोसले , प्रा.भागवत देशमुख,  प्रा. रोहित वरवडकर, प्रा. संतोषी साळुंखे,  प्रा. आकाश शिर्के, प्रा. अभिषेक पोखरकर,  प्रा. मयुर मुरकुटे, प्रा. सतिश ठाकर, प्रा. शालिनी यादव, प्रा. संदीप वर्धे, श्री. गणेश कोळी श्री. प्रभू वाल्हेकर, श्री. जालिंदर जगदाळे यांनी सहभाग घेतला.
        या शिबिरासाठी रतवाडी ग्रामस्थ तसेच श्री. नाथा झडे व दशरथ झडे यांचे सहकार्य लाभले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button