अहमदनगर

रक्तदानासाठी समाज जागृती महत्त्वाची – लक्ष्मण बिटाळ


शहाराम आगळे
शेवगाव तालुका प्रतिनिधी
विज्ञान कितीही पुढे गेले तरी आजपर्यंत रक्त कुणी तयार करू शकले नाहीत. त्यामुळे रक्तदान हेच श्रेष्ठ दान आहे प्रत्येकाने ते केले पाहिजे.रक्तदानाची व्यापक चळवळ उभी राहून जनजागृती होणे महत्त्वाचे आहे.असे प्रतिपादन आबासाहेब काकडे शैक्षणिक समूहाचे प्रशासकीय अधिकारी प्रा.लक्ष्मण बिटाळ यांनी शेवगाव येथे केले.

शेवगावात कर्मयोगी आबासाहेब काकडे शैक्षणिक समूहाचे प्रमुख अॅड.डॉ.विद्याधर उर्फ शिवाजीराव काकडे यांच्या वाढदिवसानिमित्त निर्मलाताई काकडे आर्ट्स कॉमर्स & सायन्स कॉलेज शेवगाव येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.

कार्यक्रमासाठी प्रशासकीय अधिकारी दीपक पाटील, शैक्षणिक समूहाचे विश्वस्त पृथ्वीसिंह काकडे, जनशक्तीचे महासचिव जगन्नाथ गावडे, सामाजिक कार्यकर्ते योगेश घोरपडे, डॉ.संजय लड्डा, डॉ.मनोज पूरनाळे, श्रीमती अंजली चिंतामण, श्रीमती वंदना पुजारी, कला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.प्रशांत दुकळे अर्पण ब्लड बँकचे अध्यक्ष डॉ.नरेंद्र पाटील, व्यवस्थापिक भाग्यश्री पवार. सुषमा वैद्य, सुधीर माले आदी प्रमुख उपस्थितीत होते.
यावेळी पुढे बोलतांना प्रा.बिटाळ म्हणाले की, आयुष्य जगत असताना आपल्यासमोर अचानक संकटे येतात. अनेक वेळा रुग्णांना वेळेवर रक्त न मिळाल्याने रुग्ण दगावतात. त्यामुळे समाजाच्या बांधिलकीच्या भावनेतून सर्वांनी रक्तदान केले पाहिजे. वाढदिवसाच्या नावाखाली अवाढव्य खर्च करण्यापेक्षा सामाजिक हिताचे उपक्रमातून तो साजरा केला जावा. सर्वांनी रक्तदान करून पुण्यकर्म करावे असेही आवाहन त्यांनी यावेळी बोलतांना केले.
या शिबीरवेळी ८० रक्तदात्यांनी रक्तदान केले. रक्तदान शिबीर यशस्वी करण्यासाठी अर्पण ब्लड बँक व निर्मलाताई काकडे आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज मधील प्राध्यापक व इतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.पी.ए. दुकळे यांनी सूत्रसंचालन प्रा. गुंड एस. ए. व प्रा. मिरड जे. एन. यांनी तर आभार प्रा.राजेंद्र बांगर यांनी आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button