इतर

सभासदांनी पारनेर कारखाना ताब्यात घ्या : माणिकराव जाधव

शेतकरी – कामगार महासंघाची
देवीभोयरेत बैठक

दत्ता ठुबे/पारनेर प्रतिनिधी:

पारनेर सहकारी साखर कारखान्याचा लवकरच सभासद ,शेतकरी व कामगार ताबा घेणार असल्याची घोषणा देवीभोयरे येथील शेतकरी कामगार महासंघाच्या बैठकीत करण्यात आली . राज्य सहकारी बँकेतील घोटाळा उघड करणारे शेतकरी – कामगार नेते माणिकराव जाधव यांच्या प्रमुख उपस्थित ही बैठक आयोजित करण्यात आली होती . राज्य सहकारी बँकेने किरकोळ कर्जासाठी पारनेर साखर कारखान्याची बेकायदेशीर विक्री केली असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला

. पारनेर कारखान्याची विक्री नसून तो क्रांती शुगरचा अतिक्रमण व कब्जा असल्याचा घनाघाती आरोप जाधव यांनी यावेळी केला . हा ताबा अतिक्रमण काढल्यासारखा उलथून टाका असे आवाहन त्यांनी पारनेरकरांना केले . हा ताबा मिळवण्यासाठी महाराष्ट्र राज्य शेतकरी कामगार संघटनेची ताकद देवू असेही ते म्हणाले . राज्य सहकारी बँकेच्या चौकशी अहवालात पारनेरला बेकायदेशीर विकल्याचा ठपका देखील ठेवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले . पारनेर प्रमाणे राज्यातील इतर ४९ सहकारी कारखाने या बँकेने विकले आहेत . मुंबई उच्च न्यायालयाचे आदेशानंतर या बॅकेच्या संचालक मंडळावर गुन्हा दाखल झाला आहे . सुप्रीम कोर्टानेही या गुन्ह्याला स्थगिती नाकारली आहे . आता या गुन्ह्याचा तपास सध्याचे राज्य सरकार करू इच्छित आहे . परंतु आधीचा तपास मागे घेत असल्याचे सरकारचे न्यायालयात म्हणणे याचिकाकर्ते यांना मान्य नाही . आधी तो तपास चुकीचा असल्याने रद्द करा , मगच नव्याने तपास करण्याची मागणी न्यायालयाकडे करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले .
पारनेर कारखान्याचे अस्तित्व आजही अबाधीत असून कारखान्याचे अवसायनातुन पुनर्जीवनाकडे घेऊन जाण्यासाठी बचाव समितीचा प्रयत्न उचित असून , त्यांच्या मागणीला महासंघाचा पाठिंबा असल्याचे जाहीर केले .आता कारखान्याचा ताबा घेताना तुमचे पारनेरचे आमदार निलेश लंके सभासदांची की क्रांती शुगरची बाजू घेणार हे आता तुम्हाला पहावे लागेल . राज्यातील विक्री झालेले साखर कारखाने तेथील सभासद हळूहळू ताबा घेणार आहेत , त्यासाठी मी जनजागृती मोहीम हाती घेतली आहे . राज्यातील पारनेर कारखाना प्रथम ताब्यात घेण्यात येईल असा ठराव देखील या बैठकीत घेण्यात आला .यावेळी कारखाना बचाव समितीचे रामदास घावटे , बबनराव कवाद यांनी पारनेरच्या विक्रीतील भ्रष्टाचाराबाबत माहिती दिली व आम्हाला पारनेर ताब्यात घेण्यासाठी राज्यातील महासंघाने मदत आमच्या मागे उभी करावी अशी मागणी जाधव यांच्याकडे केली . हा कारखाना ताब्यात घेवून उत्तम चालवुन दाखवू असा आत्मविश्वास बचाव समितीचे रामदास घावटे यांनी व्यक्त केला . यावेळी भाऊसाहेब खेडेकर, पांडुरंग पडवळ , रामदास कवडे , कृष्णाजी बडवे , जालींदर सालके , ओंकार सालके, संकेत शेळके , अमोल ठुबे ,भाऊ पानमंद ,पोपट लंके , शिवाजी क्षिरसागर ,संपतराव वाळुंज ,सुभाष बेलोटे ,विठ्ठल कवाद ,शंकर गुंड , रघुनाथ मांडगे, संभाजीराव सालके , बबनराव सालके ,गोविंद बडवे , ज्ञानदेव पठारे , दत्ता भुकन , बाबाजी गाडीलकर ,श्रीधर गाडीलकर ,शंकर तांबे, एकनाथ गुंजाळ भानुदास साळवे , दिगंबर घोगरे , दत्ता पवार , शिवाजी पवार , बाबुराव मुळे यांच्यासह अनेक शेतकरी कामगार उपस्थित होते .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button