अविश्रांत कर्मयोगी आमदार डॉ. सुधीर तांबे!

तरुणांचा देश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारत. देशाला महासत्ता बनविण्यात सिंहाचा वाटा ठरणाऱ्या युवा पिढी समोर अनेक आव्हाने आहेत. मात्र तरीही मार्गदर्शक व आश्वासक विचार देवून युवकांमध्ये आत्मविश्वास निर्माण करून समाजकारण, आरोग्य,पर्यावरण,शिक्षण, सहकार अशा विविध क्षेत्रात अभ्यासू लोक प्रतिनिधी असलेले नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे हे खऱ्या अर्थाने जनसामान्यांचे नेता नव्हे तर मित्र ठरले आहेत.
डॉ सुधीर तांबे हे संगमनेर मधील निष्णांत जनरल सर्जन, माणसाच्या आरोग्याच्या समस्यांप्रमाणे समाजातील अंधश्रद्धा, रुढी, परंपरा,अस्वछता, दारिद्रय ह्या समस्या कायमच्या दूर करण्यासाठी १९९८ मध्ये जयहिंद युवा मंचची स्थापना केली. हजारो युवकांच्या विचारांना दिशा देत निकोप समाज निर्मीतीसाठी त्यांनी राज्यभर काम सुरु केले. समाजकारण हा वसा जपतांना अभ्यासू व प्रामाणिकपणा आणि थेट संपर्क, नाविण्याचा ध्यास या पैलूंमुळे जनतेच्या आग्रहास्तव ते
राजकारणात आले.
मतिमंद व मुक बधिरांसाठी आधारवड ठरलेल्या आमदार डॉ.तांबे यांनी संग्राम मुकबधीर विद्यालयाच्या माध्यमातून सेवाभावी काम सुरु ठेवले आहे. प्रथमच संगमनेर नगरपालिकेचे नगराध्यक्ष होवून त्यांनी शहराच्या विकासासाठी दुरदृष्टीतून अनेक ऐतीहासीक निर्णय घेतले. पुढे विविध पदांवर काम करतांना जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील विविध क्षेत्रातील अनेकांनी संपर्क केला. एकदा पदवीधरांच्या मागणीवरून त्यांनी विधानपरिषदेची निवडणूक लढविली २०१० मध्ये पदवीधर मतदार संघातून महाराष्ट्रात विक्रमी मतांनी विजयी होण्याचा इतिहास आमदार डॉ.तांबे यांनी घडविला.
सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या शिस्तीचा व विचारांचा वारसा त्यांना लाभला. गोर – गरिब असा कोणताही भेद न करता त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सततचा ध्यास
घेतलेले पुरोगामी विचारांचे पाईक असलेले तांबे हे अविश्रांत काम करणारे आमदार म्हणून लोकप्रिय झाले आहेत. पाचजिल्ह्याच्या कामांचा प्रचंड व्याप असूनही विविध विषयांचे वाचन व प्रत्येक विषयाचा बारीक अभ्यास केला आहे. यामुळे विधापरिषदेत आपल्या अभ्यासपूर्वक मांडणी वरून त्यांनी प्रत्येक निवेदनावर सभागृहाचे लक्ष वेधले आहे. सुसंस्कृत राजकारणाचा वसा त्यांनी सतत जपला आहे. म्हणून तर खान्देशातील चोपडा रावेर ते नगरमधील जामखेडपर्यंत ते लोकप्रिय ठरले आहेत. सतत हसत मुख स्वभाव, सहज
होणारा संपर्क आणि कामाच्या पाठपुराव्याची पध्द्त यामुळे पाच जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात ते लोकप्रिय झाले असून या
तालुकयांमधील कार्यकर्त्यांचा ओघ सतत त्यांना भेटण्यासाठी येत असतो. विधान परिषदेत काम करतांना शिक्षक सेवकांच्या मानधनाची वाढ, सर्वांसाठी आरोग्य विमा योजना, बेरोगार महामंडळ, १ जाने २००५ पासून सर्व कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन योजना लागू अशा विविध महत्वांच्या प्रश्नासाठी सातत्याने पाठपुरावा करुन ती मार्गी लावली आहेत. विनाअनुदानीत शाळांचे प्रश्न तसेच तेथे काम करणारे शिक्षक वशिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रश्न सातत्याने आग्रहपुर्वक मांडणी करुन मार्गी लावले. डॉक्टर, वकील, शासकीय, निमशासकीय कर्मचारी, शेतकरी, विद्यार्थी, महिला, तरुण अशा अनेकांच्या विविध अडचणी तत्परतेने सोडवितांना संबधीत प्रश्नांसाठी केलेला
पाठपुरावा प्रत्येकाच्या आयुष्यात ठेवा म्हणून जपला जात आहे. यामुळे सातत्याने माणसं जोडली जात आहेत. काम करतांना ते कधीच कोणताही भेदभाव करत नाहीत. यामुळे
पक्षविरहीत अनेक कार्यकर्ते जिवलग मित्र झाले आहेत. म्हणून ते सर्वांचे “नेता नव्हे तर मित्र” बनले आहेत संपूर्ण खान्देशात त्यांच्या रुपाने जनतेला हक्काचे व्यासपीठ मिळाले आहे. अनेक प्रश्नत्यांच्या माध्यमातून मार्गी लागलेली आहेत. अफाट स्मरण शक्ती ही सर्वांना आचंबीत करणारी आहे. एकदा भेट झाली की नाव घेवुन हाक मारण्याची पध्दत यामुळे यामुळे उत्तर
महाराष्ट्रात अनेक युवक पहिल्या भेटीला तांबे यांचे चाहते झाले आहेत. नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे यांची त्यांना अनमोल साथ मिळाली. त्यांच्या यशात महत्वपुर्ण वाटा उचलतांना
महिला सबलीकरणासाठी जयहिंद महिला मंचच्या माध्यमातून दुर्गाताईंनी अनेक उपक्रम राबविले आहेत. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या प्रेरणेतून सुरु झालेल्या दंडकारण्य
अभियानाचे मुख्य प्रवर्तक असणाऱ्या आमदार तांबे यांनी हे अभियान सह्याद्री पासून सातपूडा पर्वतांपर्यत पोहचविले आहे. एक प्रेमळ मनाचा माणून म्हणून सर्व युवापीढी त्यांच्याकडे बघत आहे. प्रत्येक गोष्टीतील अभ्यास, नवनविन माहिती, मराठी, हिंदी,इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व यामुळे युवकांचे
आयकॉन म्हणून तांबे हे सर्वांपुढे आदर्शवत आहेत.
त्यांच्या वाढदिवसानिमित्त अमृत उद्योग
समूहाच्या वतीने लाख लाख शुभेच्छा !!
—नामदेव कहांडळ
जनसंपर्क अधिकारी,अमृत उद्योग समूह,संगमनेर