इतर

निघोज चा संदिप वराळ खुन खटला, आरोपी बबन कवाद ला नगर -पुणे जिल्हाबंदी!

सर्वोच्च न्यायालयात जामीन रदद करण्याची फिर्यादीची मागणी फेटाळली

दत्ता ठुबे/पारनेर प्रतिनिधी

: पारनेर तालुक्यातील निघोज येथील रहीवाशी असलेले सामाजिक कार्यकर्ते बबन कवाद यांच्या जामीन रद्द ची मागणी फेटाळून त्यांना अहमदनगर व पुणे जिल्ह्यात प्रवेश करण्यास सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातली आहे .
याबाबत अधिक माहिती अशी की ,निघोजचे माजी सरपंच संदिप वराळ यांच्या खुन प्रकरणातील कटात सहभाग असल्याचा आरोप बबन कवादवर आहे . यापुर्वी या प्रकरणी औरंगाबाद खंडपीठाने कवादला निघोज गावात जाण्यास बंदी घालत जामीन मंजूर केला होता . असे असतानाही कवाद याने गेल्यावर्षी जानेवारी महिण्यात कुकडी पाणी प्रश्नासाठी निघोजमध्ये जावून उपोषण केले होते . त्यामुळे न्यायालयाच्या अटींचा भंग झाला होता . म्हणून संदिप वराळ खुन प्रकरणातील फिर्यादी रंगनाथ वराळ यांनी कवादचा जामीन रद्द करण्याची मागणी औरंगाबाद खंडपीठाकडे केली होती .
खंडपीठाने जामीन रद्द केल्यानंतर त्या आदेशाला बबन कवादने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते .
सर्वोच्च न्यायालयाने दोन्ही बाजु ऐकुन
फिर्यादीची जामीन रद्दची मागणी फेटाळून लावली व अहमदनगर व पुणे जिल्ह्यात संदिप वराळ खुन खटल्याचा निकाल लागेपर्यंत प्रवेश करण्याला बंदी घातली आहे . आरोपीच्या वकीलांनी या प्रकरणात आरोपी वर्षभर बंदीवान होता हे न्यायालयाचे निदर्शनास आणून दिले . त्यामुळे हि बंदी फक्त या खटल्याच्या न्यायालयीन कामाजासाठी अपवाद राहील असेही न्यायालयाने म्हटले आहे .
बबन कवाद याचा जामीन रद्द करण्याची मागणी फिर्यादी बरोबर राज्य सरकारनेही केली होती . राज्य सरकारच्या वतीने सरकारी वकीलांनी हि मागणी केली होती . या खटल्याची सुनावणी न्यायमुर्ती अनिवृद्ध बोस व न्यायमुर्ती सुधांषु धुलिया यांचे न्यायपीठासमोर झाली . बबन कवाद यांचे वतीने वकील सुधांषु चौधरी यांनी बाजु मांडली .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button