इतर

पावसाच्या नुकसानीची सरसकट भरपाई मिळावी; भाजपा शेवगावचे प्रशासनाला निवेदन


शहाराम आगळे
शेवगाव तालुका प्रतिनिधी
परतीचा पाऊस मोठ्या प्रमाणावर झाल्याने खरीप हंगामातील हाता-तोंडाशी आलेले शेतकऱ्याचे पीक वाया गेले आहे. शेवगाव तालुका विशेषतः शेवगाव तालुक्याचा पूर्व भाग कापसाचा आगार समजला जातो, परंतु वेचणीच्या तोंडाशी आलेला कापूस अति पावसामुळे वाया चालला आहे तसेच तूर, बाजरी, सोयाबीन, मका आदी पिके व फळबागा यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे, तथापि अद्यापही पावसाचा कहर चालूच आहे. त्यामुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्याला दिलासा देण्याकरिता शासनाने अतिवृष्टी झालेल्या गावात सरसकट नुकसान भरपाई देण्याची मागणी भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी व बाधीत गावातील नागरिकांनी निवेदनाद्वारे तहसीलदार यांना केली आहे.


सदर निवेदन तहसीलदार छगन वाघ, नायब तहसीलदार मयूर बेरड, गटविकास अधिकारी महेश डोके, तालुका कृषी अधिकारी अंकुश टकले यांनी स्वीकारले. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष ताराचंद लोढे, महाराष्ट्र प्रदेश भाजपा किसान मोर्चा सदस्य बापूसाहेब पाटेकर, ज्येष्ठ नेते बापूसाहेब भोसले, नगरसेवक अशोकराव आहुजा, भाजपा ज्येष्ठ नेते सुनील रासने, कासम शेख, शहराध्यक्ष रवींद्र सुरवसे, अशोकराव खिळे, प्रा भाऊसाहेब मुरकुटे, संदीपराव देशमुख, पांडुरंग तहकीक, अंबादास ढाकणे, अशोकराव खिळे, लक्ष्मणआप्पा देवडे, राजेंद्र डमाळे, जलील राजे, सरपंच सुगंध खंडागळे, संतोष कंगनकर, बाळासाहेब हागे, रामेश्वर घुगे, सुरेशराव थोरात, संतोष कंगनकर, पत्रकार जयप्रकाश बागडे, पांडुरंग निंबाळकर, बाबासाहेब वाघुंबरे आदी उपस्थित होते.


शेतकऱ्याला मुख्यतः खरीप हंगामातील पिकावर आशा असते, परंतु कापणीला आलेले पीक वाया गेल्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. त्यामुळे पंचनाम्याचे निकष शिथिल करून अतिवृष्टी झालेल्या भागात सरसकट नुकसान भरपाई देण्याचा आग्रह प्रशासनाला यावेळी भाजपा पदाधिकारी, शेतकऱ्यांनी धरला यावेळी तहसीलदार छगन वाघ यांनी याकामी योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button