पिंपळगाव खांड धरणातील पाणी संघर्ष थांबणार !

सीताराम पाटील गायकर यांची अजितदादांकडे मध्यस्ती
पठारावरील त्या ११ गावासाठी स्वतंत्र स्टोअर टॅंक चा प्रस्ताव ?
सुनील गीते
अकोले दि १३
पिंपळगाव खांड धरणाच्या पाण्याला धक्का न लावता पठार भागाच्या पिण्याचे पाणी योजने स्वतंत्र पाणी साठे निर्माण करू मगच पाणी पुरवठा योजनांचा नारळ फोडू, जो पर्यंत हे काम मार्गी लागणार नाही तो पर्यत पाणी योजनेचा फुटबॉल बसणार नाही असा खुलासा ज्येष्ठ नेते व जिल्हा सहकारी बँकेचे माजी चेअरमन सिताराम पाटील गायकर यांनी केला
पिण्याचे पाणी योजनेच्या नावाखाली संगमनेर तालुक्यातील पठार भागाला पिंपळगाव खांड धरणातुन पाणी पळवण्याचा वादावरून निर्माण झालेल्या संघर्षावर मार्ग काढण्यासाठी जेष्ठ नेते सिताराम पाटील गायकर , आमदार डॉक्टर किरण लहामटे जिल्हा बँकेचे संचालक अशोकराव भांगरे ,काँग्रेस चे मीनानाथ पांडे यांच्या शिष्टमंडळाने मुंबईत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार ,जलसंपदामंत्री जयंत पाटील, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची भेट घेतली

या भेटी दरम्यान झालेल्या चर्चेची माहिती देण्यासाठी आज श्री गायकर यांनीं अकोल्यात पत्रकार परिषद घेतली यावेळी ते बोलत होते
गायकर म्हणाले की अजित दादा पवार अकोल्यात आले तेव्हा आम्ही पिंपळगाव खांड धरणाची मागणी केली आणि दादांनी त्याच वेळेस शब्द दिला 50 कोटी रुपये त्यावेळी लगेच या धरणावर वर्ग केले म्हणून हे काम मार्गी लागले महानंदा च्या मीटिंग ला मुंबईत जात असताना आम्ही सर्वांनी या धरणासाठी पाठपुरावा केला अजित दादा सारखा कर्तबगार माणसाच्या आग्रही भूमिके मुळे पिंपळगाव खांड धरण एका वर्षात पूर्ण झाले हे काम करत असताना अकोल्याचे सुपुत्र सेवानिवृत्त अधिकारी रो .मा लांडगे यांचे मार्गदर्शन लाभले महाराष्ट्राचे लाडके नेतृत्व शरद पवार, अजित दादा पवार यांच्या सहकार्यामुळे मुळा बारामहा झाली त्यावेळी अजित दादा पवार ,पद्मसिंह पाटील, मधुकर पिचड व आम्ही पाठपुरावा केल्यामुळे पिंपळगाव खांड धरण मार्गे लागले पिंपळगाव खांड धरणामुळे खालचे पाणी आणि वरचे पाणी असा वाद थांबला पण तरीही पिंपळगाव खांड चे पाणी हे तेवढ पुरेसं नाहीये
धरणामुळे मुळा परिसरात अनेक पाणी योजना सुरू होत आहे शेती उभे राहत आहे अनेकांनी कर्ज घेऊन आपली शेती उभी केली आहे यामुळे या धरणाचे पाणी बाहेर जाऊ द्यायचे नाही , यातून वाद होणे संघर्ष उभा राहणे ही गोष्ट सहाजिकच आहे पण तसे होणार नाहि ज्यांनी पिंपळगाव खंड धरण दिले ते आपल्या शेतकऱ्यांना उघडे करणार नाही या धरणाच्या पाणीसाठ्याला ला धक्का न लावता धरणाच्या खालील बाजूस व पठार भागात मुळा नदीवर जेथें जेथें शक्य आहे त्या ठिकाणी बंधारे अथवा केटी वेअर घेऊन या पिण्याचे पाणी योजने साठी पाणी निर्माण करू आवश्यक असणारा 20 ते 25 एम सी एफ टी चा पाणी साठा तयार करून त्यातून पाणीपुरवठा स्वतंत्र स्टोअररेज टॅंक उभा करू व पठार भागातील ११ गावांसाठी प्रस्तावित असलेल्या योजनांसाठी पाणी कसे देता येईल अशी चर्चा अजितदादांसोबत झाली असे गायकर यांनी सांगितले

कोणताही राजकारणी किंवा लोकप्रतिनिधी पिण्याची पाणी योजना होऊ नये अशी भूमिका कधीही घेणार नाही पठार भागाच्या पाणी योजनांसाठी कोणताही संघर्ष होऊ देणार नाही राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्षांचे आघाडी सरकार असल्याने कुठलाही संघर्ष होणार नाही तशी वेळ येऊ देणार नाही शेतकऱ्यांच्या हितासाठी मी स्वतः धरणात उडी घेईन पण संघर्ष होऊ शेतकऱयांचे हिताचे आड येणार नाही अशी माझी पहिली भूमिका राहील असे गायकर यांनी सांगितले ज्यांनी धरण दिले मुळा बांधण्यासाठी प्रयत्न केले त्या नेतृत्वावर विश्वास ठेवून पठार भागाचा पाणीप्रश्न निश्चित सोडवला जाईल पिंपळगाव खांड धरणाच्या खालील बाजूस घारगाव पर्यंत ज्या ज्या ठिकाणी साईट उपलब्ध आहे असेल त्या त्या ठिकाणी पाणी साठा वाढवून पाणी योजनेचा प्रश्न मार्गी लावू पाणीसाठा जोपर्यंत निर्माण होणार नाही तोपर्यंत योजनेचा फुटबॉल बसणार नाही वाटेल ती किंमत मोजून हा प्रश्न मार्गी लावू मुळा विभागाने मला चाळीस वर्ष जनतेची सेवा करण्याची संधी दिली यात मी समाधानी आहे यापुढेही जनतेबरोबर राहील संगमनेर- अकोले दोन्ही तालुके जीवाभावाचे आहेत महसूल मंत्री बाळासाहेब थोरात हे अतिशय संयमी नेतृत्व आहे त्यांच्याशी बोलून लवकरच अजित दादा कडे शिष्टमंडळासह पुन्हा चर्चा करू असे गायकर यांनी सांगितले
याप्रसंगी या पत्रकार परिषदेत काँग्रेसचे मिनानाथ पांडे , जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सिताराम देशमुख ,भाऊसाहेब बराते, विकास शेटे ,भानुदास डोंगरे ,,सुभाष गोडसे ,,भाऊसाहेब रकटे,, बाळासाहेब रंधे,, किशोर गोडसे यांनीही आपली भूमिका मांडत गायकरसाहेब जी भूमिका घेतली ती चुकीची राहणार नाही त्यांच्या निर्णयासोबत आम्ही राहू असे सांगितले
यावेळी या पत्रकार परिषदेत विठ्ठलराव चासकर विजयराव वाकचौरे ,शरदराव चौधरी, सुरेश देशमुख आत्माराम शेटे,शिवाजी वाल्हेकर आदी मुळा परिसरातील कार्यकर्ते उपस्थित होते
