हरिश्चंद्रगडावर गारठून पर्यटकाचा मृत्यू

अकोले प्रतिनिधी
सह्याद्री पर्वत रांगेतील प्रसिद्ध पर्यटक स्थळ असणाऱ्या हरिश्चंद्रगडावर मंगळवार १ ऑगस्ट रोजी सांयकाळच्या सुमारास फिरायला गेलेल्या एका पर्यटकाचा धुक्यात रस्ता चुकल्याने थंडीने गारठून मृत्यू झाला.
अनिल उर्फ बाळू नाथाराव गिते (वय ३५ रा. जालना ह.मु. कोहगाव, पुणे) असे मृत्युमुखी पडलेल्या पर्यटकाचे नाव आहे.
अकोले तालुक्यातील मुळा नदी पाणलोट क्षेत्रात हरिश्चंद्रगड परिसरात मुसळधार पाऊस कोसळत असल्याने निसर्गाने हिरवा शालू पांघरला आहे.
त्यामुळे अनेक पर्यटक हरिश्चंद्रगड परिसरात ट्रेकिंग चा आनंद लुटण्यासाठी गर्दी करत आहेत. जालना जिल्ह्यातील अनिल उर्फ बाळू नाथाराव गिते, अनिल मोहन आंबेकर, गोविंद दत्तात्र्य आंबेकर,
तुकाराम आसाराम तिपाले, महादू जगन भुतेकर, हरिओम विठ्ठल बोरुडे हे सहा पर्यटकांनी मंगळवार १ ऑगस्ट रोजी रोजी सांयकाळच्या सुमारास तोंलारखिंडीतुन हरिश्चंद्र गडावर चढण्यासाठी सुरुवात केली होती. परंतु, दाट धुक्यात सहा पर्यटकांचा ग्रुप रस्ता चुकल्यामुळे वेगळ्या दिशेने हरिश्चंद्रगड परिसरात रात्रीच्या अंधारात भरकटला होता.

रात्रीच्याअंधारात पावसामुळे भिजल्याने हे पर्यटक गारठले होते.
पावसाने गारठल्याने बुधवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास अनिल उर्फ बाळू नाथाराव गिते (वय ३५) या पर्यटकांचा मुत्यु झाला. काही पर्यटकांनी स्थानिक व वन्यजीव विभागाच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु, बुधवारी उशिराने संपर्क झाल्यावर
गुरुवारी सकाळी वन्यजीव विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी दत्तात्रय पडवळे, ए.व्ही भोये, एन एन पिचड, जी.बि.पालवी, ए.यु.धोंगडे, काळु गांवडे, तुलशीराम भारमल आदि ग्रामस्थांच्यामदतीने अनिल उर्फ बाळू
नाथाराव गिते यांचा मुतदेह दाट धुक्यातून व भर पावसात हरिश्चंद्रगडावरुन पायथ्याशी पाचनई गावात आणण्यात आला. त्यानंतर वाहनातुन हा मुतदेह राजुर ग्रामीण रुग्णालयात सायंकाळी शवविच्छेदन करण्यात आले राजूर पोलिसांनी या घटनेची अकस्मात मृत्यूची नोंद केली