अहमदनगरक्राईम

राहता तालुक्यातून दोन तर तरुण बेपत्ता!

राहता प्रतिनिधी
: राहाता तालुक्यातील बारावीला असलेले दोन विद्यार्थी बेपत्ता झाले आहेत. शाळेत जातो, असे सांगून कोहाळे येथील एका महाविद्यालयातील बारावीचा विद्यार्थी ओम विजय देशमुख (वय १७) घराबाहेर पडला. तर गुरुवारी दुसऱ्या महाविद्यालयातील निखिल संजय तासकर (रा. कोहाळे, वय १७) हा बारावीचा विद्यार्थी बेपत्ता झाला आहे.तालुक्यातून दोन विद्यार्थी बेपत्ता
झाल्यामुळे खळबळ उडाली आहे.

ओम देशमुख या विद्यार्थ्यांचे ओम देशमुख या विद्यार्थ्यांची माहिती मिळाली आहे. त्यामुळे
तपासासाठी मी जळगाव जिल्ह्यात आहे. दुसरा विद्यार्थी बेपत्ताअसल्याची माहिती मिळाली नाही. माहिती मिळाल्यावर सदर ठिकाणी चौकशी
केली जाणार असून, तपास जलदगतीने सुरू केला जाईल. असे राहत्याचे पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड, यांनी सांगितले

वडील विजय केशवराव देशमुख हे रुई
येथील माध्यमिक विद्यालयात शिक्षक
आहेत. त्यांनी राहाता पोलीस ठाण्यात
विद्यार्थ्याला पळवून नेणाऱ्या अज्ञात
व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.सदर तपासात पोलीस कॉन्स्टेबल
दिलीप तुपे व पंकज व्यवहारे करत आहे

निखिल तासकर हा विद्यार्थी घरी आला होता. त्याचा मोबाइल व चप्पल आजही घरीच आहे.
माझा मुलगा घरातून पळून गेला नसून,
त्याला अज्ञात व्यक्तींनी पळून नेले असल्याची माहिती विद्यार्थ्यांचे वडील संजय उमाजी तासकर यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button