इतर

ओंकारनाथ मालपाणी विधी महाविद्यालयाचा निरोप समारंभ

संगमनेर येथील शिक्षण प्रसारक संस्थेच्या श्री ओंकारनाथ मालपाणी विधी महाविद्यालयाच्या अंतिम वर्षाच्या एल एल बी व बी ए एल एल बी च्या २०२५ च्या बॅचचा निरोप समारंभ नुकताच दिनांक १२ एप्रिल रोजी पार पडला.

कायद्याची पदवी घेतल्यानंतर समाजात आपले स्थान; जबाबदारी ओळखून विद्यार्थ्यांनी वागले पाहिजे ;अविरत कष्ट आणि प्रामाणिकपणाची कास कधीही सोडता कामा नये असे मार्गदर्शन प्राचार्य देशमुख सर तसेच डॉ.पठारे सर यांनी केले.
याप्रसंगी प्राचार्य राहुल देशमुख सर ; प्रा.डॉ. पठारे सर ; डॉ.चौरपगार सर ; देवयानी निकम मॅडम ; सोन्नर सर तसेच इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

याप्रसंगी विद्यार्थ्यांतर्फे डॉ.बोऱ्हाडे सर ;सचिन डेरे ;रमेश साळगट ,कुणाल सोनवणे तसेच पूनम जगताप सचिन भालेराव आदींनी मनोगत व्यक्त केले.प्रवीण घेगडमल यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.
विद्यार्थी प्रतिनिधी दिपक दिवेकर यांनी या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button