संगमनेरातील नान्नज दुमाला येथे सलून व्यावसायिकाची आत्महत्या चौकशीची केली मागणी

संगमनेर प्रतिनिधी –
संगमनेर तालुक्यातील नान्नज दुमाला येथील जयवंत विलास कडवे (वय २२) या सलून व्यावसायिकाने शुक्रवारी (ता.१८) आत्महत्या करुन आपली जीवनयात्रा संपविली. , त्यास आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला असून, संगमनेरच्या उपविभागीय पोलीस अधिकार्यांकडे चौकशीच्या मागणीबाबत निवेदन दिले आहे.
नान्नज दुमाला येथे जयवंत विलास कडवे हा तरुण आपल्या कुटुंबासह वास्तव्यास होता. , शुक्रवारी जयवंतने राहत्या घरातील अँगलला दोरीच्या सहाय्याने गळफास घेतला त्याला खासगी रुग्णवाहिकेतून घुलेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठीआणले.परंतु तेथील वैद्यकीय अधिकार्यांनी तपासून मृत असल्याचे घोषित केले. त्यावरुन संगमनेर तालुका पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे.
, मयत जयवंतला गावातीलच एका मित्राने आर्थिक देवाणघेवाणीतून मारहाण केली. त्याच्या सततच्या त्रासाला वैतागून अखेर जयवंतने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली. यावरुन त्याला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप नातेवाईक आणि नाभिक समाज बांधवांनी केला आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांच्याकडे निवेदनातून करण्यात आली आहे. सदर निवेदनावर महाराष्ट्र राज्य नाभिक महामंडळाचे तालुकाध्यक्ष बाबासाहेब जाधव, कचरु भालेकर, संजय बिडवे, प्रकाश बिडवे, खंडू वाघ, रावसाहेब वाघ, लक्ष्मण वाघ, संतोष बिडवे, वैभव बिडवे, गोरख शिंदे, सतीष वाघ, गोरक्षनाथ मदने, प्रकाश बिडवे, रमेश सस्कर आदिंच्या सह्या आहेत.