अहमदनगर

सौ.निलम खोसे पाटील यांनी पारनेर तालुक्यात महिलांच्या प्रश्नांवर लेखन करावे सरपंच डॉ.कोमल भंडारी

दत्ता ठुबे

पारनेर प्रतिनिधी

पत्रकार सौ .निलम खोसे पाटील यांनी पारनेर तालुक्यातील सामाजिक प्रश्नांबरोबरच महिलांच्या प्रश्नांवर लेखन करून ते प्रश्न प्रकाशात आणून त्या सोडविण्यास मदत करावी अशी अपेक्षा अळकुटीच्या सरपंच डॉ.कोमल भंडारी यांनी व्यक्त केली.
पत्रकार सौ.निलम सुरेश खोसे पाटील यांना नुकताच महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचा महिला दिनानिमित्ताने ” सन्मान नारीशक्तीचा उत्कृष्ठ महिला पत्रकार ” हा मानाचा पुरस्कार साई नगरी शिर्डी सरला पिठाचे महंत रामगिरी महाराज यांच्या हस्ते पद्मश्री पोपटराव पवार व पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस डॉ.विश्वासराव आरोटे यांच्या प्रमुख उपस्थितीत देवून गौरविण्यात आले. त्यानिमित्त अळकुटी येथे जिल्हा भाजपा कार्यकारिणीचे सदस्य किसनराव शिंदे मित्र मंडळ व ग्रामस्थांच्या वतीने पत्रकार सौ.निलम खोसे पाटील यांचा शाल व श्रीफळ देवून आदर्श सरपंच डॉ कोमल भंडारी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.यावेळी सरपंच डॉ.भंडारी यांनी महिला पत्रकार सौ.निलम खोसे पाटील यांच्या बद्दल गौरवोद्गार काढले.


या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाबद्दल अध्यक्ष स्थानावरून बोलताना जिल्हा भाजपाचे कार्यकारिणी सदस्य किसनराव शिंदे बोलताना म्हणाले की , पत्रकार खोसे पाटील परिवार अतिशय सुसंस्कृत असून पारनेर तालुक्यातील अनेक सामाजिक,शैक्षणिक,कृषी,रोजगार, राजकीय प्रश्नांवर केलेले लेखन वृत्तपत्रांच्या माध्यमातून समाजापुढे मांडून उजेडात आणल्याने अनेक प्रश्न सुटण्यास मदत झाली.पत्रकार सुरेश खोसे पाटील व सौ.निलम खोसे पाटील हे दाम्पत्य तालुक्यातील पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेली एकमेव जोडी आहे असे गौरवोद्गार जिल्हा भाजपाचे कार्यकारिणी सदस्य शिंदे यांनी काढले.
सत्काराला उत्तर देताना पत्रकार सौ.निलम खोसे पाटील म्हणाल्या की , किसनभाऊ शिंदे मित्र मंडळ व ग्रामस्थांच्या वतीने माझा झालेला सन्मान माझ्या माहेरच्या माणसांनी केलेला सन्मान असून या सन्मानाने मी भारावून गेले, यामुळे माझी जबाबदारी वाढली आहे.मी माझ्यातील पत्रकारितेच्या माध्यमातून न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीन अशी ग्वाही पत्रकार सौ.निलम खोसे पाटील यांनी याप्रसंगी दिली.
यावेळी पत्रकार सुरेश खोसे पाटील यांचा ही मान्यवरांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.पारनेर तालुका भाजपाचे ज्येष्ठ नेते अतुल माने,अळकुटी सेवा संस्थेचे संचालक सुभाषराव भोसले,महेंद्र शिरोळे,संतोष जाधव,प्रभू जाधव,शिवाजी जाधव,रामदास भंडारी,शशिकांत कनिग्ध्वंज,चंद्रकांत शिंदे,बापू म्हस्कुले,बन्सी जगताप,रविंद्र दवे,अनिल पुंडे,पत्रकार नितीन परंडवाल,मच्छिंद्र गलांडे,सखाराम भंडारी,अतुल माने,सविता जाधव,भक्ती शिरोळे,पुनम दवे,रेणुका शिंदे,वर्षा भोसले,रेश्मा गलांडे,कविता पुंडे,सुरेखा भंडारी,गितांजली शिंदे आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button