ओबीसी समाजाची जात निहाय जनगणना करण्याची समता परिषदेची मागणी,

जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन
अहमदनगर प्रतिनिधी–
बिहार प्रमाणे राज्यातील इतर मागासवर्गीयांची स्वतंत्र जनगणना करण्यात यावी.महाराष्ट्रातही जातनिहाय जनगणना करण्याबाबतची अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेची गेल्या कित्येक वर्षांपासूनची मागणी प्रलंबित आहे। याबाबतच निवेदन आखील भारतीय समता फुले परीषदेच्या वतीने जिल्हाधिकारी डॉ.रांजेंद्र भोसले यांना देण्यात आले.
बिहार राज्यामध्ये नुकतीच स्वतंत्रपणे जातनिहाय जनगणना सुरु झाली आहे. तामिळनाडू, छत्तीसगड आणि इतर अनेक राज्यांनी सुद्धा ओबीसी जनगणना केल्या आहे. यामुळे विकासासाठी त्यांचा उपयोग झालेला आहे. . जनगणना हा विषय केंद्र शासनाशी संबंधित आहे. मात्र इतर मागासवर्गाची स्वतंत्र जनगणना करण्यासाठी केंद्र सरकारने असमर्थता व्यक्त केली आहे. त्यामुळे राज्य शासनाने बिहार सरकारप्रमाणे ओबीसींची स्वतंत्र जनगणना करावी.
देशातील अनुसुचित जाती व जमातींची जातवार जनगणना करून दीडशे वर्षे होत आलेली आहे. स्वातंत्र्यानंतर भारत सरकारने फक्त अनुसुचित जाती व जमाती यांची जातनिहाय तर इतर सर्वांची एकत्रित गणना करण्याचे धोरण स्विकारले. यातुन मागासवर्गीय ओबीसी वंचित राहिले. सन १९९४ साली केंद्र सरकारने नियुक्त केलेल्या राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाने ओबीसी जनगणना कशी आवश्यक आहे ते सरकारला तिसऱ्यादा पटवून दिले. सन २०१० च्या ५ मे ला संसदेत राष्ट्रवादीचे नाशिकचे तत्कालीन संसद सदस्य समीर भुजबळ, स्व.गोपीनाथराव मुंडे यांचेसह १०० खासदारांनी ओबीसी जनगणनेचा ठराव केला. त्यासाठी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी स्वत: मा.शरद पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय प्रयत्न केले होते. त्यातुन २०११ ते २०१४ मध्ये केंद्राने सामाजिक व आर्थिक जातगणना (SECC 2011) केली. मात्र त्याची आकडेवारी राज्यांना दिली नाही.
देशात सन २०२१ सालच्या नियमित जनगनणेचे काम अद्याप व्हायचे आहे. त्यात ही जातनिहाय गणना करावी अशी आमची सातत्याने मागणी आहे. तरी, बिहारप्रमाणेच महाराष्ट्र शासनाने इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग यांची जनगणना करावी,अशी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेची मागणी आहे.
यावेळी प्रदेशाध्यक्ष अंबादास गारुडकर , जिल्हाध्यक्ष सुभाष लोंढे, तालुका अध्यक्ष रामदास फुले , प्रदेश प्रचारक डॉ. नागेश गवळी , महानगराध्यक्ष दत्ता जाधव , श्री .संत सावता माळी युवक संघाचे संस्थापक सचिन गुलदगड , शहर बॅक अध्यक्ष अशोक कानडे, संजय गारुडकर, संजय दळवी, विजय बेल्हेकर, अशोक गोरे, भरत गारूडकर, जालींदर बोरुडे, हरीषचंद्र लोंढे, प्रा.एकनाथ होले, भानुदास फुले, सोमनाथ पुंड, शाहराजे होले, संतोष हजारे व समता सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मा.
