इतर

मनसेच्या आंदोलनाचे श्रेय लाटण्याचा पारनेरच्या आमदारांचा प्रयत्न – अविनाश पवार

दत्ता ठुबे
पारनेर प्रतिनिधी
अहमदनगर जिल्ह्यातील महामार्गावर झालेली रस्त्यांची दुरवस्था व त्यातुन निर्माण झालेल्या समस्या यावर पारनेरचे लोकप्रतिनिधी आमदार निलेश लंके यांनी उपोषण करुन उठवलेला आवाज जनतेसाठी नव्हे तर स्वतः च्या प्रसिद्धी साठी केलेला नौटंकी पणाचअसल्याचा आरोप ,मनसे चा जाहीर आरोप आहे
पारनेर तालुक्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने अहमदनगर-पुणे महामार्गावर होणारे अपघात व त्यातुन उध्वस्त होत असलेले निरपराध नागरिकांचे संसार, अपघातात अनेक निरपराध नागरिकांना आपला जिव गमवावा लागला आहे व अपंगत्व प्राप्त झाले आहे या मुद्यांवर पोलिस,तहसीलदार सह प्रशासकीय अधिकारी व जिल्हाधिकारी यांचे लक्ष वेधून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आक्रमक पवित्रा घेऊन अहमदनगर-पुणे महामार्गावर मोठ्या प्रमाणात अनाधिकृत डिव्हाडर सह पडलेल्या खड्ड्यांची डागडुजी करण्यात आली व महामार्गावर अपघातात घट झाली आहे. यामुळे पारनेर तालुक्यात जनसामान्यांच्या मनात मनसे बद्दल एक प्रकारे सहानुभूती निर्माण झाली सत्ता नसताना सुद्धा मनसेनी आक्रमक पवित्रा घेऊन प्रशासनावर दबाव निर्माण करुन कामं करुन दाखवलं तालुक्याच्या लोकप्रतिनिधीनी हेच खटकले व महामार्ग मुद्दा हायजाक करुन पारनेर तालुक्याच्या इतर महत्वाच्या मुद्द्यांला पञकार बंधुनी हात घालताच सुपा एमआयडिसी मधील कंपन्या स्थलांतरित बेरोजगारी,दहशत,गुन्डागर्दी,ठेकेदारी,टक्केवारी

पारनेरच्या पञकार बांधवांनी उपस्थित करताच यातुन पळ काढला या गंभीर प्रश्नाचे उत्तर लोकप्रतिनिधी म्हणुन दिले नाही किंवा देऊ पन शकत नाही….? या सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्या राजकीय कारकीर्दीत गुत्ता तयार करु शकतात हे लक्षात येताच लोकप्रतिनिधी यांनी राजकारणातील स्वतः च्या अस्तित्त्वासाठी मला पण जनतेच्या प्रती खुप कळवळा असल्याचे पारनेर सह जिल्ह्याच्या जनतेला भासविण्यासाठी पारनेर तालुक्यातील पञकार बांधवांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यावरुन लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न केला गेला.प्राण गेला तरी चालेल पण रस्ता झाल्याशिवाय उपोषण सोडणार नाही अशी भावणीक साद घालत जनतेला भावनिक करुन सहानुभूती मिळवायचा अघोरा प्रयत्न केला गेला. काम चालु करुन एक लेअर रस्त्यावर मारल्या शिवाय उठणार नाही अशी सिंह गर्जना पारनेरचे लोकप्रतिनिधी लंकेंनी करीत भिष्मप्रतिज्ञा केली व अहमदनगर जिल्हातील माय बाप जनतेनी ऐकली सुद्धा. महामार्गावर खरंच मला मुत्युमुखी पडलेल्या निरपराध जनतेच्याबद्दल सहानुभूती असल्याचा आव आणत उपोषण सुरू झाले. भोळी भाबडी जनता उपोषण स्थळी गर्दी करु लागली हाच विक पाॅइंट लक्षात येताच लोकप्रतिनिधींनी स्वतः च्या वयोवृद्ध आई, वडील,यांना उपोषण स्थळी आणुन परत एकदा भावनिक साद प्रसार माध्यमातून प्रसारित केली

जनतेला रस्ता हवा होता.रस्ता आणि आपण उपोषण करत आंदोलनाला रस्ता तयार करण्यासाठी बसले होते की स्वतः च्या प्रसिद्धी साठी आंदोलनाला जञेच्या स्वरुपात बदल करून काय साध्य झाले….?आंदोलनाच्या मंचाचे प्रचाराचे माध्यम बनविले …?
राष्ट्रवादी सह इतर पक्षाची मंडळी महाविकास आघाडी मंचावर अर्वाच्च शब्दांत भाषणं देऊ लागली…?
आणि स्वतः विरोधी पक्ष नेते अजित दादा पवार साहेब उपोषण सोडविण्यासाठी तत्परतेने आले…? ही अशी तत्परता अपघातात मृत्यू पडलेल्या निरपराध कुटुंबा प्रती दाखवली असती तर जनतेला पण बर वाटलं असतं पण तुम्ही ते नाही करणार तुम्हाला फक्त राजकारण करायचे आहे. अहो अजित दादा पवार साहेब आपण मंचावर उपोषण
आंदोलनामध्ये सहभागी झालात पण रस्त्यावर बळी गेलेल्या माय माऊली नागरिकांना साधी श्रद्धांजली सुद्धा आपण वाहीली नाही….? की साधी सद्भावना व्यक्त केली नाही. यावरुन हे स्पष्ट होते की उपोषण आंदोलनस्थळी फक्त आपल्या आमदारासोबत चमकोगीरी करुन राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला स्वप्न पुढची खासदारकीची पडायला चालु झाले पन एक गोष्ट लक्षात ठेवा जनतेला वेड्यात काढायचं बंद करा,जनता अाता तुमच्या भुल भुलैय्यांना बळी पडणार नाही.

पारनेर तालुक्यात कित्येक समस्या आहेत. रस्ता,विज,सुप्यात वाढती गुंडा गर्दी, तसेच स्थानिक भुमीपुञांना सोडून एमआयडीसी मध्ये चाललेल्या वाटाघाटी, सुपा एमआयडिसी मधील कंपन्या कोणाच्या दहशतीमुळे,टक्के वारी मुळे बंद पडलेल्या आहेत तर काही कंपन्या स्थलांतरित होण्याच्या मार्गावर आहे, त्यामुळे अजीत दादा पवार साहेब तुम्ही या प्रश्नाला गांभिर्याने घेऊन लक्ष घालणं गरजेचं आहे.विखेपाटील साहेब आपल्या एका चुकीच्या गोष्टीमुळे पारनेर तालुक्याची वाटचाल नक्कीच चुकीच्या माणसाच्या हातात देऊन चुकीच्या पद्धतीने चालु आहे.आपण छुप्या पद्धतीने पाठींबा देऊन केलेली चुक आज पारनेर तालुक्यातील सर्व सामान्य जनतेला भोगावी लागत आहे हे पण विसरुन चालणार नाही.राज कारणातील विरोध हा मुद्द्या ला असावा वैयक्तीक स्वार्थासाठी नसावा पण हल्ली पारनेर तालुक्यात हे उलटं चालु आहे.पारनेर तालुक्यातील मागील गोष्टींचा गांभीर्याने विचार करणं गरजेचं आहे.पोलीस प्रशासनाला हाताशी धरून दहशत निर्माण का केली जात आहे याचा सुद्धा गांभीर्याने विचार होणं गरजेचं आहे नाहीतर भविष्यात पारनेर तालुक्यात सुपा यमआयडीसी मध्ये गॅगवार झाले तर आश्चर्य वाटायला नको असे मनसचे माथाडी कामगार सेना अहमदनगर जिल्हाध्यक्ष अविनाश पवार यांनी प्रसिद्धी पञकाद्वारे सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button