इतर

पुणे जिल्ह्यातील शिव पानंद शेतरस्ते खुले करण्या साठी जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन-

दत्ता ठुबे


महाराष्ट्र राज्य शिव पाणंद शेतरस्ता चळवळीच्या वतीने शेतकऱ्यांच्या बांधावर जावुन शेतकर्‍यांच्या समस्या समजुन घेत प्रशासकीय ,न्यायालयीन पातळीवर काम सुरू केले असुन शेतरस्त्यासाठी न्याय मिळवत तोडगा काढण्यासाठी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे चळवळीच्या वतीने जिल्हयात शिवपानंद शेतरस्त्यांच्या नंबरींचे सर्वेक्षण करून नंबरी हलवणाऱ्यांना दंड सुरू करा

,जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हयातील सर्व तहसील कार्यालयातील प्रलंबित शेतरस्ता केसेस निकाली काढण्याचे तातडीने आदेश द्यावेत,समृद्ध गावांसाठी ग्रामस्तरीय शेतरस्ता समित्यांची स्थापना करून समित्यांच्या कार्यवाहीचा अहवाल शासनाने घ्यावा,चालू वहीवाटीच्या प्रत्येक शेतरस्त्याचे सर्वेक्षण करून ग्रामपंचायतींना नोंदी करून घेण्याचे आदेश द्यावेत,शेतरस्ते बंद करणाऱ्यांवर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करा,नकाशावरील शेतरस्त्यांच्या मोजणी व संरक्षण फी बंद करा, शेरस्त्याअभावी नापिक राहणाऱ्या भूधारकांना विनाअट नुकसान भरपाई द्या,प्रशासकीय कार्यालयामध्ये येणाऱ्या प्रत्येक अर्जाला उत्तर देणे बंधनकारक करा,शिवपानंद शेतरस्त्यांच्या हद्द निश्चित करून समृद्ध गावांसाठी दर्जेदार शेतस्ते करा, आशा मागणीचे निवेदन पुणे जिल्हाधिकारी यांना देण्यात आले

मुख्यमंत्र्यांसह संबंधित प्रशासकीय कार्यालयाकडे शेतरस्त्यांसाठी पाठपुरावा करूनही न्याय न मिळाल्यास सोमवार दि.०६ /०१/२०२५ रोजी पुणे जिल्हाधिकार्यालयावर शेतकऱ्यांच्या वतीने पेरू वाटप आंदोलन करण्यात येईल असा मागणी वजा आंदोलनाचा ईशारा महाराष्ट्र शिव पानंद शेतरस्ता चळवळीच्या वतीने दिला असून शेतीची वाढत चाललेली तुकडेवारी ,विभाजन शेतीमधील कमी होणाऱ्या मनुष्यबळाच्या उपलब्धतेमुळे यांत्रिकीकरण ही अपरिहार्य बाब झाली आहे शेतीमाल बाजारात पोहोचवण्याकरता व पेरणी अंतर्मशागत कापणी मळणी या स्वरूपाची यंत्रसामग्री शेतीपर्यंत जाण्यासाठी शेती पुरक व्यवसाय सर्पदंश विज पडणे पुर येणे आग लागणे यास्वरूपाच्या आपत्कालीन घटनांमुळे जीवितहानीचे वाढते धोके त्याचबरोबर शेतकरी शेतीत वास्तव्यास असून शालेय विद्यार्थ्यांना,शेतकऱ्यांना दळणवळणासाठी शेतीला बारामाही दर्जेदार शेतरस्त्यांची आवश्यकता असल्याचे निदर्शनात

आणत वेळोवेळी निवेदने आंदोलने करून न्याय न मिळाल्याने या संदर्भात नाशिक जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालयात प्रलंबित शेतरस्त्यांच्या प्रश्नासाठी,शेत तिथे रस्ता व तहसीलवर शुन्य शेतरस्ता केस ठेवाव्यात अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयावर दि.०६/०१/२०२५रोजी शेतकऱ्यांकडून पेरू वाटप आंदोलन करण्यात येईल याची प्रशासणाने गांभिर्याने दखल घ्यावी यावेळी काही अनुचित प्रकार घडल्यास प्रशासन सर्वस्वी जबाबदार राहील असे निवेदन उपजिल्हाधिकारी ज्योती कदम मॅडम पुणे जिल्हाधिकारी कार्यालय यांकडे शेतकऱ्यांनी दिले असता त्यांनी तातडीने पुणे जिल्ह्यातील सर्व तहसिल कार्यालयांना सुचना काढण्याचे आश्वासन दिले प्रत्यक्ष कार्यवाही न झाल्यास महाराष्ट्र राज्य शिवपानंद शेतरस्ता चळवळीचे प्रणेते शरद पवळे, राज्य समन्वयक दादासाहेब जंगले पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन होणार असुन यावेळी सुरेश वाळके, शांताराम पानमंद,युवराज कानसकर,दत्तात्रय बांगर,अविनाश नळकांडे, रामदास नळकांडे, राहुल शिंदे, लक्ष्मण धुमाळ,बाळासाहेब वाळके,ओमकार नळकांडे आदी शेतकरी उपस्थित होते ग्रामसमृद्धीसाठी शेवटच्या शेतकऱ्याला शेतरस्ता मिळत नाही तोपर्यंत संघर्ष सुरूच ठेवणार अरुल्याचे महाराष्ट्र राज्य शिवपानंद शेतरस्ता चळवळीचे प्रणेते शरद पवळे,राज्य समन्वयक दादासाहेब जंगले पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button