गद्दारांना मंत्रीपदं आणि खोके तर शेतकऱ्यांना काहीच नाही -उद्धव ठाकरे

अकोले प्रतिनिधी
शेतकऱ्यांचे अश्रू फुसण्या ऐवजी शेतकऱ्यां वर अश्रू धूर सोडणारे व शेतकऱ्यांवर बंदुक रोखणारे नादान सरकार आता खाली खेचावे लागेल असा इशारा शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला ते अकोले( जिल्हा अहमदनगर) येथे जनसंवाद यात्रेच्या निमित्ताने आले असता जाहीर सभेत बोलत होते
सरकार आपल्या दारी नाही तर सरकार भांडवलदारांच्या दारी असल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकार वर केली
ते पुढे म्हणाले की माझ्याकडे जिवंत आणि लढाऊ मावळे आहेत तर त्यांच्याकडे गद्दार आणि खोके आहेत
केंद्रात सरकार अश्रू धुरांच्या वापर शेतकऱ्यांवर करत आहेत शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रू पुसण्यापेक्षा ऐवजी अश्रू धुर सोडत आहे दिल्लीत येण्या पासून रोखत आहे आंदोलक शेतकऱ्यांना भेटण्यास केंद्र सरकार का घाबरते असा सवाल त्यांनी केला
मी मुख्यमंत्री असताना सर्व काही शेतकऱ्यांसाठी केले कर्जमाफी केली यांनी अच्छे दिनाचे स्वप्न दाखवले ते कुठे गेले अच्छे दिनाच्या स्वप्नावर निवडून आले यापुढे राज्यात येणारे सरकार हे शिवसेनेचे असेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला

महाराष्ट्रात यापुढे येणारी सरकार सेनेचे असे असेल
गद्दारांना मंत्री पद आणि खोके दिली जातात तर शेतकऱ्यांना काहीच नाही असा खोचक टोला लगावत त्यांनी राज्य सरकारवर प्रखर टीका केली फडणवीस हे दुसऱ्याची घर फोडणारे फोडणवीस आहे अशी टीका करत ते म्हणाले की महाराष्ट्रातील हे सरकार घटनाबाह्य आहे त्यांच्या कार्यक्रमात खुर्च्या खुर्च्या रिकाम्या असतात तर आमच्याकडे तळपत्या उन्हात देखील सच्चा कार्यकर्त्यांची गर्दी असते ही पोटदुखी त्यांना सहन होत नाही उद्धव ठाकरे कधी संपेल याची वाट पाहत आहे उद्धव ठाकरे कधीही एकटा नाही उभ्या महाराष्ट्रातील तमाम जनता आमच्या सोबत असल्याचे येणारे सरकार आमचे असेल असे ते म्हणाले
शिवसेना नेते खासदार संजय राऊत म्हणाले की आमचे चिन्ह आणि पक्ष चोरून नेले पण आमच्या सोबत जनतेची ताकद आहे मोदींमध्ये हिम्मत असेल तर त्यांनी emv मशीन ऐवजी मतपत्रिकेवर निवडणुका घेऊन दाखवा असा असा इशारा त्यांनी दिला
या प्रसंगी शिर्डी लोकसभेचे माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे, जिल्हा बँकेचे संचालक अमित भांगरे, मधुकर तळपाडे, शुभांगी पाटील मच्छीन्द्र धुमाळ,महेश नवले, प्रदीप हासे, जगदीश चौधरी ,मधुकर दराडे ,संतोष मुतडक ,राहुल लांडे
यांची भाषणे झाली यावेळी व्यासपीठावर नेवाशाचे आमदार शंकरराव गडाख, अगस्तीच्या कारखान्याच्या उपाध्यक्ष सुनीता भांगरे सतीश भांगरे संदीप कडलग बाळासाहेब नाईकवाडी मींनानाथ पांडे सुरेश गडाख आदी मान्यवर उपस्थित होते मा नगरसेवक प्रमोद मंडलिक यांनी सुत्रसंचलन केले यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला
यावेळी मोठया संख्येने नागरिकांची उपस्थिती होती